दंगल कोणाची हिंदूची की मुसलमानाची?

मागील दोन दिवसांपासून एक बातमी रोज वर्तमानपत्रात येत आहे. बातमी आहे मिरजेतील बिघडलेल्या वातावरणाबद्दल. सगळ्याच वर्तमानपत्रात अस लिहाल जातं की दंगल हिंदू- मुस्लीम मध्ये होत आहे. आता दंगल नेहमीच कुठे ना कुठे घडत असले. आणि अशा गणेश उत्सवात दंगली हा प्रकार काही नवीन नाही. आणि मला त्याबद्दल काही बोलायचे सुद्धा नाही. कारण मी काही आता मिरजेत नेमके काय घडते आहे हे काही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेली नाही. पण वर्तमानपत्रातील नेहमी अशा प्रकारच्या बातम्यांच्या वेळी एक शब्द नेहमी वापरला जातो. आणि तो म्हणजे ‘हिंदू-मुस्लीम’.

मी माझ्या महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना संगमनेरला होतो. संगमनेरच्या सरकारी महाविद्यालयात होतो (त्याला तिथ मोठ कोलेज म्हणतात). मी जिथे राहायला होतो त्यापासून पुढील भाग हा मुस्लीम वस्तीचा होता. त्याला मोमिनपुरा असे नाव आहे. आता संगमनेरचे अक्षरधाम (अंत्यविधीचे ठिकाण) ज्या ठिकाणी आहे तो भाग मुस्लीम वस्तीत आहे. रात्रीच्या वेळी कोणी अंत्यविधीसाठी कोणाला घेवून जात असेल तर रात्रीचा फायदा घेवून काही मुस्लीम लोक दगडफेक करतात. आता रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात दगडे कुठून येतात हे कळू नये म्हणून तिथले पालिकेचे पथदिवे सुद्धा फोडून टाकले आहे. आणि हि घटना ज्यावेळी घडते, त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिथल्या स्थानिक वर्तमानपत्रात नेहमी अशी बातमी येते की ‘हिंदू मुस्लिमांमध्ये दंगल’. औरंगाबाद मध्ये मागच्या शिवजयंतीला एका मशिदीतून दगडफेक झाली होती. पण बातमीत नेहमीप्रमाणे ‘हिंदू-मुस्लीम’. मला हे नेमक समजत नाही की ‘हिंदू-मुस्लीम दंगल’ म्हणजे नेमक काय?

आता मला एक सांगा तुमच्या कोणी कानफाडीत मारली तर तुम्ही अस म्हणता का की माझ आणि त्याच भांडण झाल? का अस म्हणाल की त्याने माझ्या कानफाडीत मारली?. मला तरी अस वाटत की जर त्याने कानफाडीत मारल्यावर तुम्ही त्याला मारलं तर तुमच दोघांच भांडण. नाही तर चूक त्याची की त्याने तुमच्या कानफाडीत मारली. आता ज्या ज्या वेळी दंगल होते त्या त्या वेळी मुसलमानच काही न काही उचापती करतात. हे जाळ ते जाळ, ह्याला मार त्याला मार. आणि हिंदू आपापली दारे कड्या लावून जीव मुठीत धरून बसतात. यात दंगलीत मात्र नाव दोघांच असत. आता ज्याच जळत त्याने मोर्चा वगैरे काढला तर त्याने दंगल केली काय?. मिरजेत सुद्धा जाळपोळ काही हिंदुनी केली नाही. बर ते सगळ सोडा मला एक सांगा दंगल झाली की त्यात हिंदूची नेमकी काय भूमिका असते? कोणता हिंदू रमजान मध्ये मशीदीवर चाल करून जातो? किंवा कुठली मशीद जाळली किंवा फोडली जाते? नुकसान फ़क़्त आणि फ़क़्त हिंदूचे. गणपतीच्या मूर्ती तोडा, देवीचे दागिने पळवा. मंदिराच्या दानपेट्या चोरा. कधी तुम्ही बातमी नसेल ऐकली की मशिदीतून ऐवज पळवला. अस नेहमी का होत? आता मुसलमानांना काय काम असतात की नाही हेच कळत नाही. कुठेही बघा ह्यांची डोकेदुखीच. शांतता हा काही प्रकार नाहीच. भांडण, दंगली, मारामाऱ्या हीच काम आहेत वाटत यांना. दंगल ज्यांनी केली त्यांनी केली म्हणत का नाही तेच कळत नाही. दंगल जर हिंदुनी केली तर सरळ म्हणा ना, दंगल हिंदुनी केली. कशाला बिचाऱ्या मुसलमानांचे नाव खराब करता आणि जर दंगल मुसलमानांनी केली तर म्हणा दंगल मुसलमानांनी केली. ‘हिंदू-मुस्लीम’ हा शब्द तरी मला तरी चुकीचा वाटतो.

गुजरात मध्ये गोधरा हत्याकांड मुसलमानांनी केल. अहमदाबादमध्ये शिवलिंग मुसलमानांनी तोडलं. आणि त्यापुढे मी मान्य करायला तयार आहे की दंगल फ़क़्त आणि फ़क़्त हिंदुनी केली. पण याचा अर्थ असा नाही की हिंदू-मुसलमान दंगल झाली. ज्यावेळी गुजरातेत हिंदू दंगल करत होते त्यावेळी मुसलमान मार खात होते. वर्तमानपत्र क्षेत्रात एवढे उच्चशिक्षित लोक आहेत. पण दंगल ‘हिंदू-मुस्लीम’?. दंगल म्हणजे काय क्रिकेटचा सामना आहे का दोन संघात आहे. इथे हिंदूंचा संघ प्रेक्षक वर्गात बसलेला असतो. आणि मुसलमान षटकार लगावत असतात. म्हणे दंगल हिंदू – मुस्लिमांची.

Leave a Reply