माझा अखंड महाराष्ट्र

काही बोलण्याआधी मी माझ्या सर्व मित्रांचा आणि नातेवाईकांचे आभार मानतो. की ज्यांनी ‘अखंड महाराष्ट्र’ला मतदान केले. मला या गोष्टीचा आनंद आहे, की मराठी आणि महाराष्ट्र एक ठेवण्याची भावना अजूनही प्रत्येकाच्या मनात आहे. माझ्या प्रिय भाजीपाला उर्फ भाजप याला सांगतांना मला आनंद होतो आहे की, मी भाजपचे पंधरा मते, म्हणजे ज्यांनी लोकसभेला किंवा त्याआधीही कायम भाजपला मतदान करत आले. ती मते आजच्या मतदानामध्ये त्यांच्या विरोधात गेली.

खर तर मी दहाचा आकडा मनात ठेवून चाललो होतो. परंतु माझ्या मित्रांच्या सहकार्यामुळे तो दहाऐवजी पंधरा झाला. मी उगाचंच हवेत काहीतरी बोलतोय अस बिलकुल नाही. कदाचित, लोकशाहीत हा आकडा फारच शुल्लक असेल. परंतु, मी माझा राग मतपेटीद्वारे दाखवून दिला. भाजपने जनमानसाचा मान ठेवून महाराष्ट्राच्या विकासाचे राजकारण करावे. तोडफोडीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नये.

Leave a Reply