कॅटेगरी: तंत्रज्ञान

आभासी जीवन

आभासी जीवन अर्धे जग जगत आहे. जगाची साधारणतः लोकसंख्या आठ अब्जच्या घरात आहे. त्यापैकी ५.२ अब्ज आंतरजाळाशी जोडलेले आहेत. अन ४.२ अब्ज लोक कोणत्या ना कोणत्या समाज माध्यमांवर सक्रिय आहे!

सक्रिय इतके की, जगाच्या कोणत्याही देशापेक्षा अधिक क्रयशक्ती त्यांची होते. मध्यंतरी असाच मुलांच्या दूरदर्शन संचाच्या वेडाचा एक अहवाल पाहण्यात आलेला. साधारण १२ ते १८ वयोगटातील मुले दिवसाकाठी आठ तास दूरदर्शन संचासमोर असतात असं त्यात नमूद केलेलं!

सुरवातीला हे धक्कादायकच वाटलेलं. पण जगाला भ्रमणयोजक आणि आंतरजाळाने वेडसमोर तेही फिके! आजमितीला २ अब्जच्या घरात संकेतस्थळे आहेत. १.९ पद्म (१९०० अब्ज) विपत्र/ईमेल पाठवलेली आहेत. दर क्षणाला गुगल शोधयंत्रावर लाखभर शोध घेतले जातात!

आतापर्यंत ५४ लाख नोंदी/लेख लिहिले गेले आहेत. दर क्षणाला ९५००हुन अधिक ट्विट संदेश प्रकाशित होतात. क्षणाला युट्युबवर ९२ हजाराहून अधिक चित्रफिती पहिल्या जातात. आभासी जीवन इतके मोठे आहे.

क्षणाला ११००हुन अधिक इन्टाग्रामवर छायाचित्रे. तर क्षणाला टंब्लरवर दोन हजार संदेश प्रकाशित होतात. जवळपास ३ अब्ज फेसबुकचे वापरकर्ते आहेत. पिंटरेस्टचा वापर ४० कोटीहून अधिक लोक करतात. क्षणाला सहा हजाराहून अधिक स्कायपी संभाषणे होतात. वर्षाला लाखभर संकेतस्थळांवर आभासी दरोडा टाकला जातो.

क्षणाला लाखभर जीबी माहितीच्या पाहण्या होतात. दिवसाकाठी चार लक्ष संगणक/फुलणक खरेदी केले जातात. तीस लाखांहून अधिक भ्रमणयोजकांची विक्री होते. हे सगळं इतकं मोठं आहे की आपणच नव्हे तर सर्व जग हे आभासी जगत असल्याचे द्योतक आहे.

कोणतीही गोष्ट अकारण केली जात नाही. ज्यात काही फायदा नाही अशी कोणतीही गोष्ट फारकाळ टिकत नाही. आभासी जगाचा फायदा जोपर्यंत आहे तोवर ते असेल. त्याचा प्रत्यक्ष जीवनावरही परिणाम होतो.

आपण कितीही टाळले तरी आपण त्याचा भाग झालेलो आहोत. अनेक देशांचे सरकार आंतरजाळाचा वापर आपल्या नागरिकांवर नियंत्रणासाठी करतात. प्रत्येक गोष्टीच्या चांगल्या वाईट अशा दोन्ही बाजू असतात. सूचनांचा भडीमार मुळे अनेकांच्या दैनंदिन जीवनावर ह्याचे वाईट परिणाम घडले. अपुरी झोप, चिडचिडेपणा, ताण वाढण्यासारख्या गोष्टीही वाढल्या आहेत.

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. ‘अति तिथं माती’ ही म्हण सगळीकडे लागू पडते. त्यामुळे, ह्या आभासी जगात किती रममाण व्हायचे हे ठरवायला हवे. तूर्तास इतकेच. बाकी बोलूच!!

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि येणारे दशक

कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द आपण अनेकदा ऐकला असेल. पण गमतीची गोष्ट अशी की आपण नकळत त्याचा दैनंदिन जीवनात आपण त्याचा वापरही करतो. तरीही आपल्याला ही संकल्पना नवीन आहे. तर काहींना ह्याची भीती देखील आहे! आपण एकएक गोष्ट उलगडून पाहू अन त्यावर चर्चा करू.

आपण जर अँड्रॉइडचा भ्रमणध्वनी(मोबाइल) वापरत असाल तर गुगलने आपल्याला एक सहाय्यक दिलेला आहे. त्याचे नाव गुगल असिस्टंस आहे. आपल्याला कुणाला दूरध्वनी करायचा असेल. कोणती माहिती हवी असेल. अगदी पाककलेची माहिती देखील तो देतो. आयओएसचा भ्रमणध्वनी वापरत असाल तर ‘सिरी’ नावाची सहाय्यक आहे! अमेझॉन अन मायक्रोसॉफ्ट या सारख्या कंपन्यांनी देखील अशाच प्रकारची यंत्रणा देऊ केलेली आहे. हे तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता यावर आधारलेलं आहे!

voice assistants

अजून उदाहरण द्यायचं झालं तर, आजमातीला अमेरिकेत याच तंत्रज्ञानावर आधारित टेस्ला कंपनीच्या पन्नास हजाराहून अधिक चारचाकी वाहने रस्त्यांवर धावत आहेत! तसेच ड्रोन तर आपल्या परिचयाचेच आहेत! तुम्हाला जे दररोज फेसबुक, ट्विटरसारख्या समाज माध्यमांवरील दिसणारी माहिती देखील त्याचद्वारे नियंत्रित केली जाते! नेटफ्लिक्स, युट्युबसारख्या चलचित्र दाखवणाऱ्या व स्पॉटिफाई, गाना वगैरे संगीत अन गाणी दाखवली जातात तेही नियंत्रण कृत्रिम बुद्धिमत्ताच करते! इतकंच काय आजकाल संगणक अन आभासी जगतातील सांघिक खेळातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे!

गुगलद्वारे संचालित जाहिरात विभाग देखील याच यंत्रणेवर चालतो! गुगल नकाशातील दिशादर्शन देखील याच तंत्रज्ञानाचा भाग आहे. इतकेच नव्हे तर बँकिंग अन आर्थिक सेवा याचद्वारे नियंत्रित होतात! सुरक्षा यंत्रे देखील याचद्वारे नियंत्रित केले जातात! हुश्श!!

हे दशक ह्याच कृत्रिम बुद्धिमत्तेचे आहे! बांधकाम क्षेत्रात त्याने शिरकाव केलाय! अनेक नवीन रोजगाराची क्षेत्रे याने निर्माण केली आहेत! अनेक रोजगारची क्षेत्रे नष्ट देखील होतील! इतकंच नव्हे तर भविष्यातील युद्धांची दिशा देखील हेच ठरवतील! ह्यासाठी अनेक देश गेल्या दशकांपासून ह्याचा वापर करून शस्त्रे निर्मितीत गुंतलेली आहे! ह्यापासून काही क्षेत्रे वाचलेली आहेत. ती म्हणजे कला! चित्रकारांनी काढलेल्या चित्रांचा अजून त्याला अर्थ लावता येत नाही. लेख लिहिता येत नाहीत! विश्लेषण केले तर त्याचा निष्कर्ष काढता येत नाही! पण त्याला हे शिकायला एक दशक पुरेसे आहे!

कृत्रिम बुद्धिमत्ता आता आपल्या जीवनाचे कळत नकळत जीवनाचा भाग आहे. आपण त्या बदलांचे साक्षीदार आहोत जे भविष्यातील चांगल्या वा अतिशय भयानक गोष्टींसाठी कारणीभूत होईल!!