कॅटेगरी: नोंद

पॅनकार्ड : नवे नियम

पॅनकार्ड अर्थात पर्मनंट अकाउंट नंबर. त्याचे नवे नियम प्रसिद्ध झाले आहेत. दिनांक पाच डिसेंबर पासून ते कार्यान्वित होतील. केंद्रीय कर संचालक मंडळ (सीबीडीटी) यांनी हे पॅनकार्डचे नियम ठरवलेले आहेत. यात काही चांगल्या गोष्टी देखील आहेत. (more…)

आरक्षण

आरक्षण हा कायम गाजणारा विषय. राजकारणी मतासाठी ह्याचा वापर करतात. पुतळे, नामांतर आणि आरक्षण केवळ मते मिळवण्याचे साधन! कृपया याचा अर्थ कुणाच्या आरक्षणाशी लावू नका. सरकारी नोकऱ्या, राजकीय आरक्षण व शिक्षणात कोटा मिळतो. (more…)

राज्यघटना

आपण प्रत्येकजण राज्यघटना मानतो. घटनेतील तत्वांचा आदर करतो. परंतु राज्यघटना आपल्याला माहिती आहे?. कधी वाचली आहे?. याचे असंख्य ‘नाही’ उत्तरतील. मग ती का वाचत नाही? उत्तर सोपं आहे. कारण ती वाचविशी वाटलीच नाही.
(more…)

कल्पनाशक्ती

कल्पनाशक्ती ही अनेक गोष्टीची जननी आहे. कोणतीही गोष्ट मूर्तस्वरूप येण्यापूर्वी कल्पनाच तर असते. कितीही अकल्पित वाटो. कल्पना मानवासाठी महाशक्तीच. कुणी विमानाची. कुणी जहाजाची कल्पना केली. (more…)

भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही: फुकटचा सल्ला!

भारतीय राज्यघटनेप्रमाणे भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही!

चिंता नव्हे चिता

चिंता चिताच आहे. अडचणी येतात व जातात. एक अडचण संपते तर दुसरी डोके वर काढते. त्यामुळे त्यांची चिंता का करावी?. का वेळचा घडा खर्च करावा. त्या अडचणी येणार आणि जाणार देखील. त्यामुळे चिंता करणे पहिल्यांदा सोडा. (more…)

धीर धर रे मना

धीर, धैर्य ही खूप मोठी गोष्ट आहे. आता हे सांगण्यासाठी मला साधारण तीन वर्षे घालवावी लागली. खरं तर माझा मूळ स्वभाव चंचल! एखाद्या खुशाल चेंडूप्रमाणे जीवन चाललेले! कशाची फिकीर नाही. कोणतीही अडचण नाही. शालेय जीवनात साधारण विद्यार्थी ते आजचा एक धडपडणारा उद्योजक! पण जस जसे धैर्य वाढत गेले. तसं तसे त्याचे महत्वही उमजत गेले.  (more…)

संघर्ष

संघर्ष हा जीवनाचा भाग आहे! अगदी इतका की प्रत्येक सेकंदाला आपण श्वास घेतांना देखील जीवन दोलायमान असते. मग कशासाठी संघर्षांला घाबरायचे? प्रत्येक जीव आपल्या जीवनात आपल्या क्षमतेनुसार संघर्षच करीत असतो. जन्मल्यापासून ते मरेपर्यंत तो चालतो. (more…)

कर्तव्यदक्ष तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे यांच्याबद्दल व त्यांचे कार्य आदर्शवतच! सोलापूर, पंढरपूर, नवी मुंबई, पुणे आणि आता नाशिक! त्यांच्याविरोधात केवळ कंत्राटातून आपली चैन भागवणारेच जाऊ शकतात. त्यांचे कार्य म्हणजे कायद्याचे पुस्तक! सगळीकडे हेच झाले. सोलापुरात दरवर्षी सिद्धेश्वर यात्रेची जागा म्हणजे मोकळं मैदान! धुळीचे लोट उठायचे! श्वसनाचे त्रास मोठ्याप्रमाणात व्हायचा! आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मॅट टाकण्याचा आदेश दिला. अन अनेकांच्या नाजूक भावना दुखावल्या. (more…)

बोलणे आणि करणे

बोलणे आणि करणे! आपण बऱ्याच गोष्टी बोलत असतो. बऱ्याच कल्पना मांडत असतो. अनेक चुका दिसतात त्या दाखवत देखील असतो. परंतु अनेकदा आपण स्वतः त्याचे पालन करतो का हे पाहायचे विसरतो. खरं तर एक गोष्ट आठवते. मला जे सांगायचे ते त्या गोष्टीचे सार आहे.

(more…)