आज दस का दम नावाचा एक कार्यक्रम माझ्या पहाण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान खान करतो. आज या कार्यक्रमात संजय दत्त आणि जैकी श्रोफला आमंत्रित करण्यात आले होते. मी काही हा कार्यक्रम नेहमी पाहतो असे नाही. पण आज सुटी असल्याने सहजच पहिला. कार्यक्रम चालू असताना संजय दत्तने काही वाक्य त्याच्या जीवना विषयी बोलली. “मैंने बन्दूक रखी थी, तो क्या हुआ? अपने घरवालो की इफाजत के लिए रखी थी| तो क्या गुनाह है?” “मुन्नाभाई बनानेका”. मग तो त्याच्या एका जुन्या चित्रपटातील ‘खलनायक’ या गाण्यावर नाचाला. त्याचे बोलणे एकून त्याच्या विषयीचा जो काही थोडा फार आदर होता तो पण संपला. (more…)
कॅटेगरी: नोंद
लव आजकाल
रक्षाबंधनच्या दिवशी माझी एक जुनी मैत्रिण मला राखी बांधान्यासाठी मला तिच्या कंपनीत यायला सांगितले. मी तीला सकाळी ९:१५ येतो म्हणुन सांगितले. ती ज्या कंपनीत काम करते ती कंपनी पूणे स्टेशन आयनोक्सच्या बाजूला आहे. मी आपला ९:१० लाच पोहोचलो. तीला फ़ोन केला तर ती म्हणाली की, १० मिनिटात येते. मग तो पर्यंत करायचे काय म्हणुन आयनोक्स गेट च्या बाजूला उभा राहिलो. लव आजकाल लागलेला होता. करायचे काय म्हणुन आयनोक्सकड़े बघायचो कधी तिथे जाणारे मुले मुलींकडे बघायचो. बरेच जण येत होते. सकाळच्या शो ला पण गर्दी असते हे मला त्या दिवशी बघून कळले. तिथे एका मुलगा सारख्या फेर्या मारत होता. कोणी तरी यायचे होते वाटत. जसा जसा वेळ जात होता तसा त्याचा पारा चढत होता. (more…)
पुण्यातील स्वाइन फ्लू
स्वाइन फ्लू ने पूणेकरांची झोपच उडवली आहे. सिंबायोसिस कॉलेजच्या सेनापती बापट रोड कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या एका विद्याथिर्नीला स्वाइन फ्लूची लागण झाली असल्याचा अहवाल आल्यामुळे हा कॅम्पस १३ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रिय स्वाश स्पर्धा पुढे ढकलंन्यात आली आहे. अनेक शाळा पुढे हाच प्रश्न उभा ठाकला आहे. मास्क घेउन कितपत फायदा होइल याची काही कल्पना नाही. एकुणच परिस्थिती काही चांगली नाही. कोणी नुसता शिंकला तरी लोक त्याच्याकडे भीतीने बघतात. रस्त्यावरून चालताना मास्क घातलेले लोक बघितले की जैन लोकांची फेरी निघाली आहे की काय अशी शंका येते. (more…)
‘ती’ ची आई
काय करू ती चा विषय डोक्यातून जाताच नाही. आज मी रक्षाबंधन निमित्ताने संध्याकाळी माझ्या लहान बहिणीकड़े गेलो होतो. काकाने आज जेवायलाच बोलावले होते. जेवण खुपच छान होते. जेवण करत असताना मी न राहून काकाला ती च्या बद्दल विचारले, की ती कशी आहे. आली होती का घरी? काका म्हणाला मला तीची आई म्हणाली की ती तुझ्या तिकडेच (मी जिथे राहतो त्या भागात) रहाते. आणि तीला एकदा भेटून या असे त्यानी सांगितले. मग तू भेटलास अस विचारल्यावर तो म्हणाला जाइल. काकाच्या एकुणच बोलण्यावरुन फारच दुखी किंवा काही वाटते अस काही वाटल नाही. (more…)
नितेश राणे यांचा स्वाभिमान
२ ऑगस्टला पुण्यात स्वाभिमान संघटनेच्या ३१ शाखांचे उद्घाटन झाले. मी कुठे कधी उद्घाटन झाले हे मला कळले नाही. पण ठिकठिकाणी लावलेली भित्तिपत्रके बघून समजले. आज माझा बोपोडी मधील मित्र सांगत होता की आमच्या इथे नितेश राणे आला होता. तो म्हणाला त्याचा आवाज, बोलण्याची पद्धत अगदी नारायण राणे सारखी आहे. नितेश राणे काय म्हटला अस मी माझ्या मित्राला विचारल तर तो बोलला की ‘तुम्ही कोठेही आणि काहीही करा तुमच्यावर केस होणार नाही’. (more…)
रक्षा बंधनाचा धोका…
रक्षा बंधनाच्या दिवशी माझी नेहमी महाविद्यालयाला बुट्टी. घरी सांगायचो की आज सुटी आहे. खर तर मला कोणीच मैत्रिण नव्हती तरी देखील मला भीती वाटायची. की कोणी आणून राखी बांधली तर काय?. मला ही भीती शाळेत असल्या पासून निर्माण झाली. शाळेत मुली मुलाना राखी बांधयाच्या. मग असा काय नियम नव्हता पण राखी बांधली की १० रुपये द्यावे लागायचे. आई ने कधी एक रूपया दिला नाही. मग दहा रुपये सोडाच. नंतर नंतर या मुली देखील हुशार झाल्या. एक एक रुपयाच्या ५-१० राख्या घेउन यायच्या. आणि किमान १००/- घेउन जायच्या. बर राखी नको म्हटल की, त्या मनाला वाटेल तो अर्थ काढायच्या. किंवा एखाद्या मुलीने एखाद्या मुलाला राखी बांधली नाही तरी देखील असाच काही अर्थ इतर लावायचे. (more…)
मुलीच बलवान
आज सकाळी माझ्या एका मित्राचा साखरपुडा होता. कार्यक्रम संपल्यावर मी शिवाजी नगर मधून ७ ची लोकल पकडली. बर, लोकल वेळेत आली. रेलवेचे आभार मानायला हवेत. लोकल खडकीला येताना मी एका मुलीला रेलवे स्टेशन वर धावत येताना बघितले. ती एवढी वेगात धावत होती की ती खडकी स्टेशन वर पोहचेपर्यंत लोकल दापोडीला पोहचेल. बघून हसू आले. लोकल खडकी स्टेशन वर आली . साधारणत: लोकल प्रत्येक स्टेशन वर २० सेकंड थांबते. १ मिनिट झाला लोकल निघेच ना. मी सिग्नल कड़े बघितल तिथे काही लाल दिवा नव्हता. काय झाल म्हणुन मी उतरून पाहतो तर काय त्या बाई साहेब मागाहून येत होत्या. आणि आमचा मोटारमन तिला बघत होता. बाई साहेब लोकल मधे पाउल टाकताच लोकलचा हार्न वाजला. जणू काही सलामीच दिली. लोकल निघाली. (more…)
पुण्यात नातेवाइकाकडे भोजनाचा योग आला तर
जर तुम्ही पुण्याला शिक्षणासाठी, नोकरीच्या शोधासाठी किंवा विशेष करून नातेवाइकाना भेटायला येण्याचा विचार करत असाल तर येण्या आधी काही गोष्टींचे ध्यान ठेवा. विशेषत हा अनुभव नातेवाइकांकडे येण्याची दाट शक्यता आहे. शाळेत असताना मी नेहमी दिवाळीच्या सुटीत, आणि कधी कधी में महिन्याच्या सुटीत माझ्या पुण्यातील काकाकडे मी यायचो. त्यावेळी कधी काही समजले नाही. पण आता कळते. पूणेकरांची भाषा ही साखरेपेक्षा गोड. त्यांच्याशी वाद घालणे म्हणजे स्वत:च्या पराभवाला आमंत्रण देणे असा असतो. पुण्याला खुप मोठा इतिहास आहे, या माधुर्यपूर्ण भाषेचा. मी लहान असताना आई सोबत नेहमी माझ्या पुण्यातील मावशीकडे जायचो. पहिला दिवस मजेत जायचा. मावशी, काका, दादा आणि ताई खुप लाड करायचे. मग काय दुपारी मावशी आमरस, रात्री काका आइसक्रीम, दादा माझ्या सोबत दंगामस्ती करायचा. (more…)
ऑस्करचा झाला धोबी पछाड़
मध्यंतरी एक मराठी चित्रपट ‘एक डाव धोबी पछाड़’ आला होता. अशोक सराफ, त्याच्या बद्दल काय बोलावे? मराठी अभिनेत्यांचा राजा. चित्रपट हिट झाला. मी तो पहिला आहे. तुम्हीही बघितला असेल. मस्त चित्रपट. काल सहजच टाइमपास करावा म्हणुन टीवी पाहत बसलो. बिंधास मुव्ही वर एक खुप जुना चित्रपट लागला होता. चित्रपटाचे नाव होते ऑस्कर. बघतो तर काय यात देखील कथा आणि धोबी पछाड़ ची कथा सारखीच. त्यातला नायक देखील एक मोठा गुंड असतो. त्याला एक मुलगी असते. असो चित्रपट तर तुम्ही धोबी पछाड़ बघितला आहे ना. अगदी जसच्या तस. (more…)
राज ठाकरेंचे आंदोलन आणि मी
ही गोष्ट २००८ मधील आहे. त्या वेळी मी फोर्ट मधील (मुंबई) एका छोट्याशा सॉफ्टवेर कंपनीत कामाला होतो. आणि रहायला बोरिवलित. बोरीवली ते चर्चगेट असा माझा दररोजचा प्रवास. मुंबईचे आकर्षण कोणाला नाही? कंपनी तुन सुटल्यावर घरी जाण्याची घाई कधीच नसायची. लवकर घरी जायचे असे पण काही नसायचे. मुख्य म्हणजे मी रहायला मावशीच्या जुन्या घरात असल्याने तिथे मी एकटाच. म्हणतात ना ‘एकटा जीव सदाशिव’ त्यातली गत होती. कंपनीतुन मला निघायला ७ वाजायचे. आणि बोरिवलित पोहचयाला ८- ८:३० व्हायचे. लोकलला कायम गर्दी. पण कधीही त्याचा तिटकारा वाटला नाही. (more…)