कॅटेगरी: गोष्ट

बोलणारी गुहा

बोलणारी गुहा! एका जंगलात एक सिंह रहात होता. एके दिवशी तो शिकारीच्या शोधात तो जंगलात फिरू लागला. पण त्या दिवशी त्याला एकही शिकार मिळाली नाही. शेवटी तो थकला.

दिवस संपला. सिंह भुकेलेला पुन्हा आपल्या गुहेकडे परतू लागला. वाटेत त्याला एक गुहा दिसली. त्याने विचार केला, एकदा या गुहेत डोकावून तर पहावं! भक्ष्य मिळाल्यास आजची भूक भागेल.

त्याने आत जाऊन पाहीले तर गुहा रिकामी होती. सिंहाने सुस्कारा सोडला. आता पुन्हा आपल्या गुहेकडे निघावं या विचाराने तो त्या गुहेतून बाहेर पडू लागला.

तेवढ्यात त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. संध्याकाळ झाली आहे. या गुहेत राहणारा प्राणी परतत असेल. मी याच गुहेत दडी मारून बसतो. म्हणजे मला बसल्या बसल्या आयती शिकार मिळेल. अन माझ पोट भरेल.

विचार मनाशी पक्का करून तो त्याच गुहेत लपून बसला. अन भक्ष्याची वाट पाहू लागला. ती गुहा होती एका कोल्ह्याची. तो कोल्हा थकून आपल्या गुहेजवळ आला. एकाएकी कोल्ह्याची पाऊले थबकली. संध्याकाळच्या धूसर प्रकाशात त्याचे लक्ष जमिनीवरील सिंहाच्या पायाच्या ठशांकडे गेले.

कोल्ह्याने विचार केला! सिंहाच्या पावलांचे ठसे गुहेत तर गेलेले दिसत आहेत. परंतु बाहेर आलेले दिसत नाही! म्हणजे याचा अर्थ सिंह गुहेत बसून माझी पाहतोय तर. जर उशीर झाला असता तर अंधारात मला हे ठसे दिसले नसते.

कोल्ह्याला एक युक्ती सुचली. त्याने मोठ्याने ‘गुहे, ए गुहे’ अशी आरोळी ठोकली. थोडा वेळ थांबून पुन्हा आरोळी दिली. गुहेच्या आत लपलेला सिंह ते ऐकत होता. कोल्हाने पुन्हा आरोळी दिली अन म्हणाला, ‘गुहे तू आज बोलत का नाही? रोज जेंव्हा मी आवाज देतो. तेंव्हा तू दरवेळी मला उत्तर देतेस.’

गुहेत लपलेल्या सिंहाला वाटलं गुहा बहुदा बोलत असावी. आज आपल्या भीतीने ती बोलत नसावी. आपण प्रत्युत्तर देऊ जेणेकरून कोल्हा गुहेत येईल. थोड्या वेळाने कोल्ह्याने पुन्हा आरोळी दिली.

गुहेत लपून बसलेला सिंह दबक्या आवाजात म्हणाला, ‘येरे ये, आजचा दिवस कसा होता?’ कोल्ह्याने लागलीच सिंहाचा आवाज ओळखला. सिंहाला वाटलं आता कोल्हा गुहेत येईल.

तेवढ्यात, बाहेर असलेला कोल्हा म्हणाला, ‘सिंह महाराज बोलणारी गुहा कधी तुम्ही पाहिलीय का?’. सिंह चपापला. पुढे कोल्हा म्हणाला, ‘तुम्ही गुहेतच राहा. मी निघतो!’. हे ऐकताच सिंहाला आपली चूक लक्षात आली.

सिंह लगेचच गुहेबाहेर आला. येऊन पाहतो तर काय कोल्ह्याने धूम ठोकलेली!

तात्पर्य: बुद्धीने मोठ्या संकटावरही मात करता येते!

बोलणे आणि करणे

बोलणे आणि करणे! आपण बऱ्याच गोष्टी बोलत असतो. बऱ्याच कल्पना मांडत असतो. अनेक चुका दिसतात त्या दाखवत देखील असतो. परंतु अनेकदा आपण स्वतः त्याचे पालन करतो का हे पाहायचे विसरतो. खरं तर एक गोष्ट आठवते. मला जे सांगायचे ते त्या गोष्टीचे सार आहे.

(more…)

स्वभाव

स्वभाव ही खुपंच मजेदार गोष्ट आहे. तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. म्हणजे नेमक काय हे सांगता येणार नाही.आपले वागणे

स्वतःचे निरीक्षण करून पहा. मी जसा घरी असतांना वागतो. तसा बाहेर किंवा इतर ठिकाणी वागत नाही. सर्वांचेच जवळपास असेच असते.

माझा एक मित्र आहे. त्याला राग आल्यावर तो समोरच्या व्यक्तीला मनाला टोचेल असे बोलतो. आता त्याच्या घरी देखील तो तसाच आणि बाहेरही तसाच.

काल मैत्रिणीला दिलेला पेन ड्राईव्ह आणायला गेलो होतो. निघतांना काकूंना, फराळाला या अस म्हटलं. लगेच माझी मैत्रीण ‘फक्त काकूच का?’ अस म्हणाली. मैत्रिणी बद्दल काय बोलावं? प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेते.

माझा स्वभावाबद्दल थोडक्यात बोलायचे झाले तर, ‘जशास डबल तसे’ असा आहे. आता नेमक कसं सांगू? माझा पीएम यावर नीट बोलू शकेल.

अप्सरा खुपंच रागीट आहे. राग नाकावर असतो. प्रत्येक जण जितका प्रेमळ तितकाच रागीट असतो. जितका चांगला तितकाच वाईट देखील.

आपण आपल्यातील वाईट रूप लपवून ठेवतो. आईचा स्वभावात सडेतोडपणा! जे आहे ते तोंडावर सांगणे. माझे वडील काही बोलत नाही. आपल्या कृतीतून दाखवतात. त्यामुळे प्रत्येकाचा स्वभावाच विशेष आहे.

स्वभाव बदलणे खुपंच अवघड आहे. थोडक्यात आपण स्वतःला नवीन रूप दिल्याप्रमाणे असते. गांधीजींनी गोळी खाल्ल्यावर ‘हे राम’ म्हटले. कदाचित राहुल बाबा ‘हे मॉम’ म्हणेल.

जसे आपण असतो तसे दिसतो. काही व्यक्ती पाहिल्यावर आपल्याला नकोसे वाटते. तर काही ‘लव्ह एट फस्ट साईट’.

प्रत्येकाच्या स्वभावावर ते अवलंबून असते. स्वभावसारखे असतील तर मैत्री होते. काहींचा स्वभावच मनमिळावू असतो. त्यांचा मित्रपरिवार बनतो. काहीजण एकलकोंडे.

शेवटी सगळंच स्वभावावर अवलंबून असते. म्हणजे जर बुशचा स्वभाव आपल्या मनमोहनसिंग सारखा असता तर.. अमेरिकेत अजून दहावीस इमारतीवर विमाने येऊन धडकली असती.

वातावरण आणि परिस्थिती यावर स्वभाव बनतो. काहींना घराचा सहवास कमी मिळाला तर त्यांना ‘घराबद्दल ओढ’ निर्माण होते. काहींचे अगदी उलटे.

थोडक्यात, मला फक्त अस म्हणायचे आहे की स्वभाव आपल्याला सुधारू अथवा बिघडून टाकू शकते.

अर्धवट गोष्ट एका मंदिराची

एक आटपाट नगरात एका नदीतीरी एक भव्य मंदिर होते. मंदिर होते एका मर्यादा पुरुषोत्तमचे. न्याय आणि सुराज्याचे दुसरे नाव. असा तो. तर लोकहो, बाबर नावाच्या एका परकीय शत्रूने त्या नगरीवर हल्ला करून ती जिंकली. त्या मर्यादा पुरुषोत्तमचे मंदिर देखील पाडले. तिथे त्याने स्वतःच्या नावाची एक मशीद उभारली. पण तिथे कधीही नमाज पढला गेला नाही. शतकामागून शतके उलटली. पुढे जावून त्या देशावर ब्रिटीशांचे राज्य आले. तिथल्या लोकांनी आपल्या मर्यादा पुरुषोत्तमचे मंदिर उभारण्यासाठी ब्रिटिशांना विनंती, अर्ज करण्यात आले. पण ब्रिटीश सरकार मानेना. (more…)