कॅटेगरी: ब्लॉग

चिंता नव्हे चिता

चिंता चिताच आहे. अडचणी येतात व जातात. एक अडचण संपते तर दुसरी डोके वर काढते. त्यामुळे त्यांची चिंता का करावी?. का वेळचा घडा खर्च करावा. त्या अडचणी येणार आणि जाणार देखील. त्यामुळे चिंता करणे पहिल्यांदा सोडा. (more…)

इंधन दर जास्ती कशासाठी?

इंधन दरात भाववाढ होणे याचाच अर्थ महागाई वाढणे. कारण, इंधनाचा थेट परिणाम वाहतुकीवर व पर्यायाने दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतीवर होतो. वाहतूक खर्च वाढला तर उत्पादनाच्या निर्मितीचा खर्च वाढतो. जो वस्तूची किंमत वाढून वसूल केला जातो. हा सामान्यांना जितका त्रासदायक आहे तितकाच सरकारी पातळीवर आनंद देणारा आहे. (more…)

सिंहाच्या बछड्यांची गोष्ट

एक गोष्ट! कोणे एके काळी भरत खंडात गुजराच्या सिंहाचे राज्य होते! त्याचे अनेक बछडे होते. प्रत्येक बछड्याचे सिंहावर फार प्रेम. त्याची डरकाळी भरतखंडाला हादरे देत असे. बाकीचे प्राणी विशेषतः वाघ, हत्तीनां त्याचा विशेष राग होता. सुरवातीला सगळं ठीक चाललेलं. पण पुढे जाऊन सिंह मनात आलेल्या गोष्टी सर्वांना अंमलात आणावयास लावी. कधी नोटाबंदी तर कधी प्राणी गणना! (more…)

भेदभावाचे अर्थकारण

भारत माझा देश आहे व सर्व भारतीय माझे बांधव आहे हा शुद्ध गैरसमज वाटावा अशा गोष्टी घडत आहेत. अर्थकारण देखील तेच! जेव्हा व्हिडीओकॉनचे धूत नियमाप्रमाणे कर्ज काढतात आणि त्याचे हप्ते देखील वेळेवर भरतात. तरीही इन्कम टॅक्स विभाग त्यांना समन्स पाठवतो व चौकशीला बोलावतो! पन्नास कोटीसाठी डीएसकेनां कारागृहात जावे लागते. त्याउलट नऊ हजार कोटींचे कर्ज फेडू न शकलेल्या अनिल अंबानींना ना कारागृहात जावे लागते न इन्कम टॅक्सकडून साधे पत्र जाते. ह्याला भेदभाव नाही तर काय म्हणायचे? (more…)

काय महत्वाचे?

महत्वाचे काय? आपण कुठे चाललो आहोत ह्याच भान राहिलेलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. फालतू नगरसेवकाच्या पोटनिवडणुकीत मुर्दे पाडले जातात. गुन्हेगार चक्क राज्यातील आमदार! गुन्हेगारांना पोलीस चौक्यातून सहीसलामत सुटका करणारे देखील राज्याचे आमदार! पाणी पडल्याच्या कारणावरून खून आणि अनधिकृत नळजोडणी मनपाने तोडली म्हणून दंगल केली जाते. (more…)

दिशा आणि दशा

दैनंदिन कामाच्या गराड्यात आपण आपल्यालाच विसरून जातो! दिशा नसतेच! आपल्याला काय करायला हवे वा आपल्याला जे करायचे असते ते न होताच आपण गुंतून पडतो. कधीकधी कामाचा व्याप एवढा वाढतो की आपण जे ठरवलेलं असत ते देखील विसरून जातो! अगदी आठवीपासून न चुकता अर्थर्वशीर्ष, रामरक्षा व मारुतीस्तोत्र म्हणायचो! गेल्या वर्षभरापासून ते कामामुळे रोजच राहून जायचं. पुन्हा सातत्य यायला वर्ष गेलेलं. (more…)

निष्पाप सलमान

खरंच किती अन्याय ह्या निष्पाप सलमान खानवर! न्यायसंस्था खंबीर आहे म्हणून बरं, नाहीतर ह्या क्रूर लोकांनी दयावान व भारताचा ब्लॅक डायमंड व आमच्या लाडक्या सलमानला त्रासून मारले असते. नाही मला तुम्ही सांगाच आता! फुटपाथवर गाडी घातली मग काय असं मोठं केलं. मान्य आहे आमच्या भाईने दारू ढोसलेली. बरं गाडी खाली कशाला यायचं लोकांनी? चूक त्या गरिबांची आहे. उलट आमच्या भाईनीं देश हिताचेच काम केलं. आता फुटपाथवर झोपायला काय बसायलाही लोक घाबरतात. आणि कुणी बसलेच तर झोपेतही सलमाची स्वप्न पडतात. देशकार्य केलं म्हणून पुरस्कार द्यायचा सोडून केस टाकली? (more…)

भाषा

भाषा /बोलण्याची पद्धत महत्त्वाचीच! थोड्या वेळापूर्वीच सोसायटीतील एका सभासदाच्या भावाचा फोन आलेला. प्रसंग अगदी सोपा! सोसायटीच्या भिंतींवर दोन दिवसापूर्वी परस्पर दोन तीन ठिकाणी स्वतःची सदनिका विकण्याची जाहिरातीचे पत्रक लावलेली. माझ्या सांगण्यावरून सुरक्षारक्षकाने ती काढलेली. अपेक्षेप्रमाणे साहेबांचा फोन आलेला. मी देहूरोड इथे राहतो. मला न विचारता आपण ती पत्रके कशाला काढलीत वगैरे वगैरे (खरं तर संस्थेच्या अध्यक्ष या नात्याने मी विचारायला हवं होत!). मला खरं तर हसावं की रडावं तेच समजेना. साहेबांना ‘सेक्रेटरीशी बोला’ असं म्हणून मी फोन कट केला. (more…)

कायदा आणि आपण

खरं तर कायदा बद्दल काही बोलावं असं मनात नव्हतं. परंतु गेल्या काही काळापासून हे वातावरण या देशात आहे ते पाहता बोलणं भाग आहे. देशाला पुढे जायचं असेल तर तशी इच्छा आधी इथल्या लोकांमध्ये असणे जरुरी आहे. मी रोज घरापासून माझ्या कचेरीत येण्याच्या रस्त्यांमध्ये चौकाचौकात असलेल्या सिग्नल तोडणाऱ्यांचे प्रमाण पाहतो. घरी जातांना फुटपाथला लागून असलेल्या रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या दुचाकी आणि चारचाकी उभ्या गाड्या पाहतो. हातगाड्या आणि फेरीवाल्यांना पाहतो. पैशाशिवाय सरकारी काम होणार नाही अशी धारणा असलेल्या माझ्या सोसायटीतील सभासदांना पाहतो. रस्त्याच्या कडेला असलेला कचरा पाहतो. कचरा टाकणाऱ्या आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना पाहतो. मग मनात प्रश्न उभा राहतो की खरंच आपल्या लोकांची मानसिकता नेमकी काय आहे? (more…)

आधारकार्ड : माझा विरोध कशासाठी?

काही बोलण्याआधी काही स्पष्ट करावेसे वाटते. आधारकार्ड एक चांगली योजना आहे. परंतु ज्या प्रकारे तिचा आवाका वाढवला त्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना अशी योजना असावी ही त्यावेळचे उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी चाचपणी झाली. त्यानंतर आलेल्या मनमोहन सिंह यांच्या काळात याला मूर्त स्वरूप आले. रेशन व अन्य काही गोष्टीपुरता याचा आवाका होता. २००९ साली निलेकेणी या इन्फोसिस संस्थापकांचा मार्गदर्शनाखाली एक कंपनी सुरु करण्यात आली. मला युआयडीएआयच्या इतिहासात जायचं नाही. थोडक्यात, सरकारने एका भागीदार झाले. मग काय नियम असतील. कायदा कसा असेल यातही निलेकेणी यांच्या सौ. कंपनीने सरकारला सल्ले दिले! (more…)