महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्राचा इतिहास हा जितका वैभवशाली आहे तितकाच तो अंधारातही आहे! शालेय शिक्षणात आपल्याला हा इतिहास शिकवला तर महाराष्ट्राचे भविष्य उज्वल आहे!

इतिहासाचे मुख्य तीन भागात विभागणी होते. एक ज्ञान नाही असा इतिहास. एक माहिती आहे पण त्याचे फारसे उपलब्ध नाही. अन एक भाग ज्याची लिखित साधने उपलब्ध आहे. पहिल्या भागाला प्राचीन! दुसऱ्या भागाला मध्ययुगीन अन तिसऱ्या भागाला आधुनिक संबोधतो.

महाराष्ट्राच्या इतिहासाचा विचार केला तर साधारण एकूण ज्ञात दोन हजार वर्षांचा इतिहास आहे! पूर्वी महाराष्ट्राला रठ्ठ, महारठ्ठ, अश्मक वगैरे नावे होती! साधारण इसवीसनाच्या सुरवातीचा इतिहास पहिला तर संपूर्ण दक्षिण भारतावर राज्य असलेले मावळचे सातवाहनांना दक्षिणाधिपती म्हटले जायचे! हे तेच वीर आहेत ज्यांच्यामुळे शालिवाहन शकाची कालगणना मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली.

सातवाहन

तत्कालीन इराण, अफगाणीस्थातून आजच्या पाकिस्तानात उदयास आलेल्या शक नावाच्या बलशाली जमातीने भारतात दिग्विजय करत महाराष्ट्रावर चाल केली! अन आताच्या पंढरपूर भागात ती लाखोंच्या सेनेसोबत पराक्रमी सातवाहनांशी ते लढले. अन तो दिवस म्हणजे शालिवाहन शके सुरु झाले! त्याच विजयाचे प्रतीक म्हणजे मराठी संस्कृतीचे नववर्ष अर्थात गुढीपाडवा!!

महाराष्ट्र हा मुळातच देशाचा अनभिषिक्त सम्राट! रक्षणकर्ता अन राष्ट्रपती! रठ्ठ या संस्कृत शब्दाचा अर्थ मुळी मार देणारा असा होतो. आता महारठ्ठचा अर्थ तुम्ही लावलाच! दंड देण्याचा अधिकार राजाला असतो या अर्थाने महाराष्ट्र हा देशाचा मुख्य अन रक्षणकर्ता होतो.

महाराष्ट्र इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात आंतरराष्ट्रीय व्यापार करीत होता. याचे पुरावे आजही उपलब्ध आहेत! हे यासाठी सांगतो कारण काही भेळपुरी अन पाणीपुरीच्या दुकानांना विकास म्हणत असतात! देशातील गुप्त साम्राज्यातही गुप्तांनी महाराष्ट्राशी स्नेहाचे संबंध राखले व राजकीय डावपेचांनी महाराष्ट्राच्या तत्कालीन बलदंड वाकाटकांच्या साम्राज्याला आपल्यावर चाल करू दिली नाही!

तेराव्या शतकाच्या अखेरीस देवगिरीच्या यादवांचा पराभव पाताळयंत्री अल्लाउद्दीन खिल्जीने करून हा अजेय भूभाग पहिल्यांदा काबीज केला! लक्षात घ्या देशाच्या दीड हजार वर्षांच्या गुलामीच्या काळापैकी महाराष्ट्र केवळ ४५० वर्षे गुलामीत होता!

पुढील साडे तीनशे वर्षे महाराष्ट्र गुलामीच्या अंधकारात खिचपत पडला! पुढील इतिहास थोडाफार आजही माहिती आहे! स्वराज्यसूर्य शिवरायांच्या आगमनाने महाराष्ट्राने जुने कापडे फेकावीत तशी गुलामीच्या साखळदंड फेकले अन त्रिखंडावर अधिपत्य गाजवणाऱ्या मुघलांच्या सत्तेला सुरुंग लावला.

शिवरायांच्या गमनानंतर दख्खन काबीज करण्याच्या हेतूने मुघल बादशहा औरंगजेब स्वतःला पाच लाखांच्या अन मोठ्या खजिन्यासह महाराष्ट्रात तळ ठोकला. दगाफ़टक्यामुळे महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज त्याच्या तावडीत सापडले! मुघलांना साजेल अशी क्रूर अन निर्घृण हत्या त्याने करवली!

त्यानंतर न राजा न राजधानी पण महाराष्ट्राचे मराठा वाघ अतिविराट अशा शत्रूशी झुंज देत होते! पुढे बोलण्याआधी एक गोष्ट सांगतो. जो बोलायचा राहून गेला. प्राचीन रघुकुल नावाच्या संस्कृत ग्रंथात नमूद केल्यानुसार असा योद्धा जो दहा हजार योध्यांशी लढू शकतो असा मराठा! अशा मराठ्यांचे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र!!

मराठा या शब्दाचे संस्कृत रुप महाराष्ट्र आहे अर्थात ज्यांचे राष्ट्र मोठे आहे ते मराठे. मरहट्टा, महारठ्ठा,रठ्ठा म्हणजे राष्ट्र,रठ्ठा मार देणे,महारथ, महारथी म्हणजे मराठा उर्फ राष्ट्रपती या संज्ञा प्राचीनकाळी अत्यन्त शौर्यशाली रणधुरन्धर क्षत्रिय राजबिण्ड्या पुरुषांनाच लावीत असत. याला आधार रघुवंशाच्या ६व्या सर्गामधील पुढील श्लोक आहे-

“‘एको दस सहस्राणि योधयेद्यस्तु धान्विनाम। शस्त्रशास्त्रप्रवीणश्च स वै प्रोक्तो महारथ:। अमितान्योधयेद्यस्तु संप्रोक्तोऽतिरथस्तु स:। रथस्त्वेकेन योद्धा स्यात्तन्न्यूनोऽर्द्धरथ: स्मृत:।’ !!

भावार्थ – शस्त्रशास्त्रात म्हणजे रणविद्येत प्रवीण होऊन जो एकथा क्षत्रिय दहा हजार योद्ध्यांबरोबर लढू शकतो त्या रणधुरन्धरासच मरहट्टा- महारथ महारथी म्हणतात.”

२७ वर्षे अखंड युद्धानंतर मुघलांच्या पाच लाखांची सेना कापली तर गेलीच पण सातत्याने होणाऱ्या मराठ्यांच्या हल्ल्याने मुघल बादशाह हैराण झाला व गतप्राण झाला! अन तिथून महाराष्ट्राने मागे पाहिले नाही! अगदी दिल्ली अन पुढं आताचा पाकिस्तानही ताब्यात घेत महाराष्ट्राने देशातील परकीय शक्तींना नष्ट केले! दिल्लीचा बादशहा नामधारी बनला! महाराष्ट्राच्या वाघांनी अफगाणीस्थाच्या सीमेवर गुरगुरायला सुरवात केलेली. दुवा: https://en.wikipedia.org/wiki/Maratha_Empire

मराठेशाही

लक्षात घ्या! शिवरायांच्या युद्धनीतीमुळे ब्रिटीश व युरोपियन सत्ता मराठेशाहीत खिळखिळ्याच नव्हे तर जमही बसवू शकल्या नव्हत्या. पुढे आपल्याच उत्तर भारताने घात केला अन पाठ दाखवून पळून गेलेला अब्दाली पानिपतात भारी पडला! तीन आठवड्यांच्या उपासमारीने महाराष्ट्राचे वाघ पानिपतात तहानभुकेने चक्कर येऊन कोसळत होते!

जगातील सर्वात भीषण लढायांमधील ती एक भीषण लढाईत अफगाणी अब्दाली शिल्लक राहिला ह्यायोगे विजयी ठरला! शेकडो मराठी स्त्रिया व मुले गुलाम बनवल्या गेल्या. त्यातील बहुतांश व्यक्ती पुढे शिखांनी अब्दालीकडून सोडवून घेतल्या. परंतु, त्या युद्धानंतर महाराष्ट्राची अख्खी तरुणाई कामी आली! अन ह्या देशाचा वाघ कमकुवत झाला!

त्याचाच फायदा घेऊन ब्रिटिशांनी मराठ्यांशी चाळीस वर्षे झुंजून देश ताब्यात घेतला! लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की महाराष्ट्र बलदंड होता तर परकीय पाय ठेऊ शकत नव्हता! उत्तर भारतीयांच्या गद्दारीने देश दीडशे तर महाराष्ट्र शंभर वर्षांसाठी गुलामीत गेला.

मग माझ्या मराठी वाघांनो, तुम्ही ठरवूनही सामान्य राहू शकत नाही! चारशे मावळ्यानिशी उभा कडा चढणारा अन दोन हजाराच्या सेनेला पराभूत करणारा नरवीर तान्हाजी मालुसरे असो वा अख्ख्या सेनेला खिंडीत गाठणारा स्वयं यमराज झालेला बाजीप्रभू देशपांडे असो! वा शत्रूला युद्धाची दाणादाण उडवणारे संताजी धनाजी असोत! हे वाघ ह्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मले!

हा इतिहास आहे महाराष्ट्राचा! सोनं पिकवणारी जमीन अन पहाडाच्या छातीची माणसं ही ह्या महाराष्ट्राची ओळख! आता लक्षात आलं असेलच का हा इतिहास शाळेत शिकवत नाहीत! महाराष्ट्राचा इतिहास चे बाळकडू घेणारा कारकून म्हणून नव्हे तर वाघ बनून बाहेर पडेल!!

मराठीचा आग्रह कशासाठी?

अनेकांना मराठीचा आग्रह हा राजकारण वा भावनिक आहे असा मोठ्ठा गैरसमज आहे. अन हा गैरसमज बहुतांश मराठी भाषिकांमध्ये आहे! त्यांच्यासाठी हा लेखप्रपंच!

खरं तर हा कुणाला दोष द्यावा असा विषय नाही. आम्हाला शाळेत शिक्षकांनी हिंदी राष्ट्रभाषा आहे असं खोटं बिंबवलं! न आम्हाला दक्षिणाधिपती सातवाहन माहिती न शिवरायांनी पन्नास वर्षात उभे केलेले ३५०+ दुर्ग/किल्ले उभे केले हे माहिती! मग ज्यांना आपण कोण हेच माहित नाही त्यांना मराठी विषयी ममत्व असण्याची आशा बाळगले हे चूकच आहे!

तर वस्तुस्थितीवर बोलूयात! मराठी भाषा महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा असून ती देशातील तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. जगातील सहा हजार भाषांपैकी सर्वाधिक भाषा बोलण्याच्या यादीत दहाव्या क्रमांकावर ती येते.

आता कायद्याची वस्तुस्थिती काय आहे ते समजून घेऊ. भारत हे एक संघराज्य आहे. राष्ट्र या युरोपियन संकल्पनेप्रमाणे नसून अमेरिकन पद्धतीच्या संघराज्यीय व्यवस्था आहे. खचितच प्रत्येक राज्याला बरेच अधिकार आहेत! समानता असावी हा त्यामागील हेतू!

प्रत्येक राज्याच्या भाषेला राज्यघटनेनुसार भारतीय भाषा असण्याचा बहुमान प्राप्त आहे. आता आपल्या देशात ७८० भाषा स्वातंत्र्यावेळी होत्या. आता त्यापैकी २२०च्या भाषा स्वर्गवासी झाल्या आहेत. त्यावर नंतर कधीतरी सविस्तर चर्चा करू! मुद्दा इतकाच ह्या भारताला २२ प्रमुख भाषेचा दर्जा आहे. यात मराठी येते!

घटनेने २२ भाषांना प्रमुख भाषा देतांना भेदभाव केलेला नाही. आता तुम्ही म्हणाल, हिंदी राष्ट्रभाषा आहे वगैरे.. तर बाळांनो, देशातील सर्वात मोठा ४२० चा गुन्हा त्यांच्यावर दाखल होऊ शकतो जो हे पसरवतो की, हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. त्यामुळे, त्याची वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या देशाला राष्ट्रभाषेचा घटनेत कुठेही उल्लेख नाही. केंद्र सरकारला त्याच्या आस्थापनांच्या अंतर्गत कार्यासाठी इंग्रजी व हिंदी भाषा वापरण्याची मुभा आहे. परंतु, याचा अर्थ ती अधिकृत किंवा राष्ट्रभाषा आहे असा होत नाही.

हिंदी अतिरेक्यांनी (अतिरेकीच शब्द योग्य आहे!) हिंदी राष्ट्रभाषा करावी म्हणून प्रयत्न केला. परंतु विरोधातील मतांच्या अधिक संख्येमुळे तिचा पराभव झाला. अन मग अतिरेक्यांनी हिंदी भाषेचं खुळ राज्यघटनेत नमूद करवून केंद्राच्या पैशाने भाषा वाढवण्याचा प्रयत्न करविला! आता आलं लक्षात हिंदी अतिरेकी का म्हणालो ते?

आता मूळ विषयाकडे येवूयात! प्रत्येक राज्याची स्थापना ही भाषिकांच्या व भाषेच्या आधारावर झालेली आहे. ते करत असतांना अनेक अक्षम्य चुका झालेल्या आहे! त्या सुधारणे आवश्यक आहे! पण भाषावार प्रांतरचना करण्यामागील हेतू भाषिक स्वातंत्र्य असावे असा होता!

महाराष्ट्र अधिनियम क्र.५ (महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४) अन्वये मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला व तिची लिपी देवनागरी लिपी असल्याचे जाहीर करण्यात आले.

मग जर हिंदीसाठी १० राज्ये अन १ केंद्र सरकार मिळालेले आहेत. मग मराठीसाठी फक्त एकुलता एक महाराष्ट्र आहे. अन कायद्यानुसार तिचा अनिवार्य वापर करणे शासनास बाध्य आहे तर महाराष्ट्रात मराठीचा आग्रह हा देशद्रोह नसून शुद्ध देशभक्ती आहे. याउलट मराठी नाकारणारे कायद्यानुसार देशद्रोही ठरतात!

ठरवा मग कायदा पाळून देशभक्त व्हायचे की देशद्रोही!

समाज माध्यमांची एकाधिकारशाही

खरं तर समाज माध्यमांविषयी काही बोलावं असं काही ठरवलेलं नव्हतं. परंतु, सातत्याने समाजमाध्यमांवर येणारी बंधने बोलायला भाग पाडतात.

साधारण, वर्षभरापूर्वीची गोष्ट असेल. माझा असाच एक मित्र! साधारण त्याच्याशी आभासी जगातुन झालेल्या संपर्काला आता एक तप झालं असेल. त्यावेळी म्हणजे साधारण २००८-०९ च्या सुमारास, तो अन मी नोंदी/ब्लॉगद्वारे व्यक्त व्हायचो. पुढे ब्लॉग लिहिण्यात फारसा रस राहिला नाही. अन संपर्क तुटला.

पुढे २०१६ मध्ये ट्विटर या समाजमाध्यमाद्वारे पुन्हा संपर्कात आलो. त्याहीवेळी त्याच्याकडून समाज माध्यमांवर येणारी बंधने विषयी माहिती मिळायची. परंतु, तसा अनुभव नसल्याने फारसं गांभीर्य वाटत नसायचे! साधारण दोन वर्षांपूर्वी त्याने कंटाळून पुन्हा ब्लॉग सुरु करायचे ठरवले. अन पुनश्च आमचा संपर्क कमी होत गेला.

त्याचा विषय घेण्यामागे तो त्यावेळी ज्या गोष्टी सांगायचं ते मी मध्यंतरी अनुभवल्या. राजकीय स्वार्थासाठी (खरं तर त्यामागे अर्थकारण दडलंय) एका प्रतिष्ठित समाज माध्यमाने बिनदिक्तपणे कोणतेही कारण न देता परस्पर निलंबित केले. पुढे वर्षभर मी दुसऱ्या खात्यावरून विचार मांडण्याचा प्रयत्न केला परंतु, तिथेही हजारदा संबंधित समाजमाध्यमाकडून अडचणी उभ्या टाकायच्या!

मग मी समाज माध्यम बदलून माझे विचार मांडायला सुरवात केले! तिथेही जाणीव व्हावी इतका त्या समाज माध्यमांचा अंकुश! खरं तर प्रत्येकजण आपले मत मांडण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करीत असतो. परंतु, जर तेच होणार नसेल तर तिथे जाण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातो!

एका ठराविक पक्षविशेष पटेल तेच दाखवणे वा त्या खात्यावर अप्रत्यपणे बंधने लादणे खरं तर हा त्या खात्यांचा कमाईचे साधन असू शकेल. परंतु, त्याने एक गोष्ट अधिरेखित होते की समाज माध्यमे एकाधिकारशाही गाजवतात! त्यामुळे पुनश्च हरी ओम करण्याचे योजलेले आहे! पाहुयात हा उत्साह किती काळ टिकतो ते!

सुधारणा

सुधारणा ही सातत्याने घडणारी प्रक्रिया आहे. म्हणजे उदाहरणार्थ गेले वीस वर्षांपूर्वी आपण ज्या पद्धतीने जीवन जगत होतो त्याच पद्धतीने आज जगत नाही. एक अविनाशी प्रक्रिया म्हणा हवं तर!

सुधारणा करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने प्रगती करणे. आपण दिवसात अनेक कामे वारंवार करतो. त्यात बदल घडवून आपण आपला वेळ व श्रम वाचवू शकतो. हेच प्रगतीचे लक्षण आहे.

कालपेक्षा आज केलेले काम उत्तम होण्यासाठी सुधारणा ही आवश्यक असते. त्यासाठी निरीक्षण व योग्य बदल करणे अपेक्षित असते. ती जर घडली नाही तर आपण आपली प्रगती करू शकत नाही.

वा करण्याचे टाळले तर जगाच्या गराड्यात आपण हरवून जातो. मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे दर सहा महिन्याला मोठे बदल घडतात. अनेक गोष्टींची सुधारित आवृत्ती तयार होते.

जो त्या स्वीकारून पुढे जातो त्याला यश हे हमखास मिळते. आपले प्रश्न व अडचणी ह्या सुधारण्याचा गुरुकिल्ली आहेत. प्रश्न वा अडचणी आल्याचं नाहीत तर जीवनात सुधारण्याच्या प्रक्रियेलाच खीळ बसेल.

त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी सातत्याने स्वतःतील बाबींवर स्वतःच निरीक्षण करून त्यात बदल करा. हेच बदल नवे अनुभव देतील. व यशाची कवाडे उघडतील!

अनेकदा कामाच्या व्यापामुळे आपण नवीन गोष्टी करण्याचे टाळतो. अथवा त्यासाठी वेळ काढत नाही. परंतु त्यामुळे सुधारणांची प्रक्रिया खुंटते. पर्यायाने विकासाचा मार्गच थांबतो.

जगात जवळपास मोठ्या कंपन्या स्वतःचा असा एक विभाग (रिसर्च अँड डेव्हलपमेंट) बनवतो जो या आहे त्या पद्धतीत नावीन्य कसे आणता येईल. आपली वेळेची बचत कशी करता येईल. अन उत्पादनाचा दर्जा कसा सुधारता येईल याची काळजी घेतो.

त्यामुळे स्वतःला घडावा. स्वतःच्या गोष्टीत नावीन्य आणण्यासाठी प्रयत्नशील रहा. हाच प्रगतीचा व विकासाचा राजमार्ग आहे. त्यात काही चुका घडल्याचं तर त्याची चिंता करू नका. चुकातूनच माणूस शिकत असतो. उलट चुका न करणाऱ्याला देवच म्हणायला हवे.

सकारात्मक दृष्टीकोन अनेक सुधारण्याचा वाव देतो व स्वतःची प्रगती साधतो. त्यामुळे जगाची चिंता सोडा. स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. अनेक बाबी सुधारता येतील. अन त्यातून अनेक प्रश्नांची उकल होईल.

शाळेत असतांना विनोबा भावेंचा एक धडा वाचलेला. त्याच शीर्षक होत ‘स्वरूप पहा विश्वरूपाची चिंता करू नका’. चला तर मग.

बोलणारी गुहा

बोलणारी गुहा! एका जंगलात एक सिंह रहात होता. एके दिवशी तो शिकारीच्या शोधात तो जंगलात फिरू लागला. पण त्या दिवशी त्याला एकही शिकार मिळाली नाही. शेवटी तो थकला.

दिवस संपला. सिंह भुकेलेला पुन्हा आपल्या गुहेकडे परतू लागला. वाटेत त्याला एक गुहा दिसली. त्याने विचार केला, एकदा या गुहेत डोकावून तर पहावं! भक्ष्य मिळाल्यास आजची भूक भागेल.

त्याने आत जाऊन पाहीले तर गुहा रिकामी होती. सिंहाने सुस्कारा सोडला. आता पुन्हा आपल्या गुहेकडे निघावं या विचाराने तो त्या गुहेतून बाहेर पडू लागला.

तेवढ्यात त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. संध्याकाळ झाली आहे. या गुहेत राहणारा प्राणी परतत असेल. मी याच गुहेत दडी मारून बसतो. म्हणजे मला बसल्या बसल्या आयती शिकार मिळेल. अन माझ पोट भरेल.

विचार मनाशी पक्का करून तो त्याच गुहेत लपून बसला. अन भक्ष्याची वाट पाहू लागला. ती गुहा होती एका कोल्ह्याची. तो कोल्हा थकून आपल्या गुहेजवळ आला. एकाएकी कोल्ह्याची पाऊले थबकली. संध्याकाळच्या धूसर प्रकाशात त्याचे लक्ष जमिनीवरील सिंहाच्या पायाच्या ठशांकडे गेले.

कोल्ह्याने विचार केला! सिंहाच्या पावलांचे ठसे गुहेत तर गेलेले दिसत आहेत. परंतु बाहेर आलेले दिसत नाही! म्हणजे याचा अर्थ सिंह गुहेत बसून माझी पाहतोय तर. जर उशीर झाला असता तर अंधारात मला हे ठसे दिसले नसते.

कोल्ह्याला एक युक्ती सुचली. त्याने मोठ्याने ‘गुहे, ए गुहे’ अशी आरोळी ठोकली. थोडा वेळ थांबून पुन्हा आरोळी दिली. गुहेच्या आत लपलेला सिंह ते ऐकत होता. कोल्हाने पुन्हा आरोळी दिली अन म्हणाला, ‘गुहे तू आज बोलत का नाही? रोज जेंव्हा मी आवाज देतो. तेंव्हा तू दरवेळी मला उत्तर देतेस.’

गुहेत लपलेल्या सिंहाला वाटलं गुहा बहुदा बोलत असावी. आज आपल्या भीतीने ती बोलत नसावी. आपण प्रत्युत्तर देऊ जेणेकरून कोल्हा गुहेत येईल. थोड्या वेळाने कोल्ह्याने पुन्हा आरोळी दिली.

गुहेत लपून बसलेला सिंह दबक्या आवाजात म्हणाला, ‘येरे ये, आजचा दिवस कसा होता?’ कोल्ह्याने लागलीच सिंहाचा आवाज ओळखला. सिंहाला वाटलं आता कोल्हा गुहेत येईल.

तेवढ्यात, बाहेर असलेला कोल्हा म्हणाला, ‘सिंह महाराज बोलणारी गुहा कधी तुम्ही पाहिलीय का?’. सिंह चपापला. पुढे कोल्हा म्हणाला, ‘तुम्ही गुहेतच राहा. मी निघतो!’. हे ऐकताच सिंहाला आपली चूक लक्षात आली.

सिंह लगेचच गुहेबाहेर आला. येऊन पाहतो तर काय कोल्ह्याने धूम ठोकलेली!

तात्पर्य: बुद्धीने मोठ्या संकटावरही मात करता येते!

कायदे आणि अंमलबजावणी

कायदे आणि अंमलबजावणी ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत! फार जड विषयावर बोलत आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आपल्या देशात मनमानी कारभार सुरु आहे! (more…)

एक देश एक भाषा संकल्पना

एक देश एक भाषा संकल्पना ही मुळातच भारतीय नाही. एका जर्मन तत्वज्ञ जोहान गोटलिब सतराव्या शतकात मांडली. व तिला अधिकृत स्वरूप मिळवून दिले.
दुवा- https://babelzine.co.uk/wp-content/uploads/2018/11/No25-Article-Language-and-nationalism.pdf

(more…)

बौद्धिक दुष्काळ

बौद्धिक दुष्काळ हा इतर कोणत्याही दुष्काळापेक्षा अधिक भयावह आहे. ३७० कलमाची झिंग झिंगून सरकार इतके बेफाम झाले की महाराष्ट्रातील धरणाच्या खिडक्या उघडून मोकळे झाले. ज्याला आपण लोकशाहीचा एक आधारस्तंभ वगैरे म्हणतो. ते पत्रकारिता तर बोलायलाच नको!

मुळात धरणात किती पाणीसाठा आहे. किती पाऊस झाल्यावर धरणे भरतात. ही माहिती जलसंपदा विभागाला माहित नाही असे होऊ शकत नाही. तीन चार महिने दुष्काळाने महाराष्ट्र त्रस्त असतांना!

अगदी अनेक शहरात पाणीकपात सुरु असतांना धरण कोणताही विचार न करता सोडून देण्यात आली. कधी नव्हते ते घडले. राज्यातील पाचशेहुन अधिक गावे पुराने वेढली गेली! कोल्हापूर, सांगली अगदी पुणे देखील संपर्काच्या बाहेर गेली.

सोळा लोकांचे जीव गेले. मुक्या जनावरांचा तर आकडेवारीच नाही! टीव्हीवर आपले जलसंपदामंत्री राज्याचे काही सोयर सुतक नसल्याप्रमाणे ३७०च्या झिंगेत झिंगलेले. बातम्यांच्या वाहिन्यांना तर ३७०च्या नशेत होती!

इकडे दूध व्यवसाय असो, इंधनाचे व्यवस्थापन ठप्प झाले! तिकडे इंदापूरसारख्या तालुक्यात थेंबभर पाऊस नसतांना गावे पाण्याखाली गेली. पुणे शहरातील पूल पाण्याखाली गेल्याने दोन दिवस वाहतूक ठप्प झालेली.

बरं, दोष कुणाचा तर म्हणे पाऊसाचा! कुठला कडक गांजा ओढतात देव जाणे! पाऊस राजाप्रमाणे आला. पडू लागला! पण आमच्या झोळ्या फाटक्या! बरं याआधीच कोकणातील एक धरण फुटलेलं! सात गाव पाण्याखाली गेलेली. पंचवीसहुन अधिक जनांचे बळी गेलेले.

अजून पाच धरणांमधून पाणीगळती मोठ्या प्रमाणावर होत आहे. तीन वर्षांपूर्वी महाड पुलाची दुर्घटना झाल्यावर सर्व धरणांचे स्थापत्य शास्त्र विभागाकडून चाचणी घेतलेली! त्यात राज्यातील सर्व धरणे धोकादायक आहेत असा अहवाल देखील राज्य सरकारला मिळालेला.

अजूनही आमच्या राज्य सरकारला किमान डागडुजी करावी याचीही जाणीव झालेली नाही! गेल्या पाच वर्षात एक नवे धरण उभे राहिले नाही! गेल्या पाच वर्षात देशातील एकमेव धरण जे उभे राहिले ते छोटेसे तेलंगणा राज्याने उभे केलेलं!

दर दोन वर्षांनी दुष्काळ पडतो. तो का पडतो? पाऊस पडला तर धरणाची क्षमता इतकी कमी कशी? जर पाणी सोडले तर पूरपरिस्थिती निर्माण कशी होते? आपत्ती व्यवस्थापन का नाही?

असे प्रश्न सरकारला निर्माण न होणे हे सर्व बौद्धिक दुष्काळाची लक्षणे आहेत! जर प्रत्येक गोष्ट पावसावर ढकलायची असेल तर सरकार काय फक्त कर गोळा करण्यासाठी आहे काय? एकूणच सावळा गोंधळ आहे!

संकट आणि आपण

संकट आणि आपण! संकट येतात आणि जातात! संकटे आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. तरीदेखील आपण संकट आले म्हणून घाबरतो!

मला सांगा जगात असे कोण आहे ज्यावर कधीच संकट आले नाही? असे कोण आहे ज्याचे जीवन सुखात गेले? मुळात संकटे ही सुखाचे महत्व समजावतात व आयुष्याला नवी दिशा देतात.

दिवसानंतर रात्र व रात्रीनंतर पुन्हा दिवस येतो. त्यामुळे जर आयुष्य संकटांनी अंधारले असेल तर लक्षात ठेवा आनंदनाचा प्रकाश येण्याची वेळ झाली आहे!

कोणतीही गोष्ट कधीही कायम नसते! त्यामुळे संकटे येतील जातील! त्यासाठी मनाची तयारी हेच सर्वात मोठं हत्यार आहे! शिवरायांनी ज्यावेळी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेली त्यावेळी त्यांचे वय तरी असे किती होते? अन त्यांचे स्वप्न तर हिमालयाएवढे!

स्वराज्य स्थापन झाल्यानंतर देखील थोडीच संकटे थांबली! अनेकदा जीवावर बेतेल अशी व्यवस्था नियतीने केलेली! पण स्वराज्य उभे राहीले व ते पुढे जाऊन शत्रूचा कर्दनकाळ ठरले! मग विचार करा! आपल्यावर असलेले संकट त्याहून मोठे आहे का?

संकटावर मात केली जाऊ शकते! संकटे देखील संकटात सापडतात! कोणतेही संकटावर उपाय हा असतोच! इवलीशी मेणबत्ती अंधाराला चिरून टाकते! आपण तर माणसे आहोत!

संकटे आली म्हणून कोणीही कमी होत नसतो! उलट संकटे आपल्याला अधिक मजबूत बनवतात! आपली परीक्षा आहे असे समजा! लोखंडाला हवा तो आकार घेण्यासाठी आगीच्या भट्टीत तावून सुलाखूनच जावे लागते!

रामाला देखील वनवासात जावं लागलेलं! संकटे ही प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात! त्यामुळे माझ्यासोबतच असं का हा विचार मनातून काढून टाका! त्याच्याशी लढा! संकटांवर तुटून पडा! संकटे संकटात नक्की येतील!

आयुष्य सुंदर आहे! नसेल तर ते बनावता येऊ शकते! आपण सकारात्मक राहिलो तर नक्कीच बदल घडविला जाऊ शकतो! संकटे केवळ आपल्या क्षमतेची चाचणी घेत असतात! संकटे कितीदा आले तरी ते आपल्या फायद्याचेच! आपण स्वतःची सुधारणा करण्याची उत्तम संधी!

त्यामुळे संकटे आली म्हणून किंवा नाही आली म्हणून आयुष्यात स्वतःला सुधारणांनी सुधारा! आयुष्य एकदाच मिळते! हे कधीही विसरू नका! संकटकाळात स्वतःला कधीही कमी समजू नका. मेहनतीवर संपूर्ण लक्ष केंद्रित करा!

कोणताही विजय दैनंदिन केलेल्या श्रमाचे फळ असते व हेच सत्य आहे! जीवनाला आकार देण्यासाठी ही संकटे येतात!

वाहनांची मराठी पाटी

वाहनांची मराठी पाटी बेकायदेशीर नाही. मुळात कायदा आपण कधी वाचतच नाही. अगदी बोटावर मोजण्याच्या गोष्टीपलीकडे आपण त्याकडे पाहतही नाही. तिथूनच फसवणुकीला सुरवात होते!

एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. मराठी क्रमांक असलेल्या गाडीच्या पाट्यांच्यावर ट्विटरवर सर्रास तक्रारी होतात. मुख्यत्वे ह्या तक्रारी अमराठी भाषिकांकडून केल्या जातात.

खरं तर ह्यात दोष अमराठी भाषिक राज्यातील कायद्याचा आहे. अमराठी राज्यांनी स्वतःचा वाहन कायदा नसल्याने तिथे केंद्रीय मोटार वाहन कायदा लागू होतो.

केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार (केंद्रीय मोटर वाहनांच्या नियम १९८९ चा नियम ५० आणि ५१) वाहनाची पाटी इंग्रजीत / रोमन लिपीत असणे बंधनकारक आहे. सदर कायदा महाराष्ट्रात लागू होतो का? तर याचे प्रामाणिक उत्तर नाही असे आहे!

महाराष्ट्राचा स्वतःचा असा मोटार वाहन कायदा अस्तित्वात आहे. सदर कायद्याप्रमाणे महाराष्ट्रात वाहनांच्या पाट्या कशा असाव्यात याबतात वर्णन आहे. परंतु, लिपीचा कोणताही उल्लेख यात नाही.

मध्यंतरी याबाबत राज्य सरकार देवनागरी लिपीतील पाटयांना परवानगी असेल असा बदल करून यातील शंका दूर करणार होते. परंतु सरकारी कारभार आपण जाणत असालच!

त्यामुळे अमराठी लोकांना महाराष्ट्रातील कायदे माहित नसणे गैर नाही. परंतु आपण कायद्याचे ज्ञान घेऊन त्यांना समजावून देणे आवश्यक आहे! यासाठी आपण कायद्याचे ज्ञान घेणे आवश्यक आहे.

बहुतांश वेळा सोशल मीडियावरील पोलीसांचे खाते देखील सांभाळणारे अमराठी लोकांनी अकारण दंड लावण्याच्या घटना घडल्या आहेत. वेळ आहे जागरूक होण्याची.

कायदे हे आपल्या सुलभतेसाठी आहेत. त्याचा शस्त्राप्रमाणे वापर करू द्यायचा नसेल तर पुढाकार घेणे आवश्यक आहे. वाहनांची मराठी पाटी कायद्यानुसार गुन्हा नाही!

मुळात महाराष्ट्रात मराठी राजभाषा अधिनियमानुसार पाट्या ह्या मराठीत असणे आवश्यक आहे. तिथे गाड्यांच्या मराठी पाट्यांना विरोध करणे गैर आहे. गाडी चालकाचा बॅच मराठीत असावा असही नमूद आहे.

यावर कधी कोण विरोध करत नाही. महाराष्ट्रात गाड्यांना देवनागरीतील पाट्यांना विरोध हा बहुतांश अज्ञानातून होतो आहे. याला कायदा समजावणे हाच उपाय आहे!

आपण कायद्याच्या गप्पा मारत आहोत. अन तिकडे स्वतः मोटार वाहन विभाग कायदे तोडत आहे. त्यांच्या वेबसाइटवर त्यांनी सर्व कायदे इंग्रजीत प्रसिद्ध केले आहेत. मुळात हाही कायद्याचा भंग आहे!