सकारात्मकता

सकारात्मकता

सकारात्मकता ही आजच्या काळातील सर्वात कठीण बाब. नकारात्मक राहावे अशी परिस्थिती. महागाई, रस्त्यांची दुरावस्था, स्त्रियांवर अत्याचार, गुन्हेगारी. यामुळे कठीण झालं आहे.

कोरोनाच्या काळातील अनुभव. त्याकाळी कोरोनाने मरणाऱ्या लोकांपेक्षा त्याच्या भीतीनं अधिकजण गेले. शासकीय आणि वृत्तसंस्थांनी ती भीती पराकोटीला नेली. माझ्या घरात वृत्तवाहिन्या फारशा लोकप्रिय नसल्याने त्रास कमी झाला. भीती पाठी ब्रह्मराक्षस. हे खरंय. नवीन गोष्टी शिकणे हा सकारात्मक राहण्याचा सोपा उपाय. नवीन गोष्टी सकारात्मकता निर्माण करतात. नाविण्य नसेल तर नकारात्मकता वाढते. हे माझे निरीक्षण आहे. नकारात्मकता वाद आणि अशांततेची जननी आहे. अन त्यातून क्वचितच चांगले साध्य होते. बदल देखील आयुष्य सुकर करतात. मग ते बदल कितीही लहानसे का असेनात.

प्रकाश देखील सकारात्मता वाढवतो. जिथं अंधार तिथं आरोग्याला धोका. जिथं आरोग्य नाही तिथं समाधान नाही. आणि जिथं समाधान नाही तिथं नकारात्मता वाढते. समाधान हा मोठा विषय आहे. त्यावर कधीतरी सविस्तर चर्चा करूयात. थोडक्यात, प्रकाश महत्वाचा आहे. सातत्याने एकाच गोष्टीचा विचार करणेही त्रासदायक असते. एकच विचारांमुळे मानसिक आरोग्य बिघडते. अतिरेक वाईटच असतो. मनात विचार येतात. विचार मनाला पटतात. अन त्यातून कृती होते. अन कृतीतून बदल घडतात. त्यामुळे चांगले विचार अंगी बाळगायला हवे.

अशा अनेक लहान लहान गोष्टीतून सकारात्मकता वाढू शकते. चांगली संगत आयुष्याला आकार देते. चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्याने सकारात्मक दृष्टिकोन बनतो. त्यामुळे चांगल्या संगतीत राहावे. दिवसाचे चक्र लवकर सुरु केल्याने देखील अनेक लहान सहान प्रश्न सुटतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. अनेकदा वेळेअभावी अनेक गोष्टी करायच्या राहतात. त्यामुळे लवकर उठणे फायद्याचे ठरते. स्वतःसाठी वेळ दिला तर चिंतन करणेही शक्य होते. काम रेंगाळली की ताण येतो. ताण नकारात्मकता आणि चिडचिडेपणा वाढवते. त्यामुळे सकाळी लवकर उठण्याची सवय चांगली आहे. सुखद सकाळ दिवस चांगला जाण्यास मदत करतो.

नकारात्मकता हा रोग आहे. असे चाणक्य सांगतो. कितीही कठीण परिस्थिती येवो. सकारात्मकच राहायला हवे. दिल्ल्लीश्वरो वा जगदीश्वरोवा म्हणणारे असतांना सहा शाह्या उलथून मराठी स्वराज्य उभे ठाकले. ह्यापेक्षा प्रेरणादायी अन्य काय गोष्ट? त्यामुळे कायम सकारात्मकच रहा. हाच यश मिळवण्याचा मार्ग आहे. यश म्हणजे काय हाही एक मोठा विषय आहे. त्यावर नंतर सविस्तर बोलूया.

नोंदी

नोंदी

नोंदी लिहिण्यासाठी सुचावं लागत. अन त्याहून मोठं त्यासाठी वेळ द्यावा लागतो. मध्यंतरीच्या बराच मोठा काळ दोन पैकी एक गोष्ट नसल्याने काहीही होत नव्हतं. अगदी ठरवून देखील. परंतु, गेल्या काही दिवसातील परिस्थिती पुन्हा लिहिण्यास उद्युक्त करीत आहे.

एक चीड, विचार मनात वादळ निर्माण करतो. अन नोंद तयार होते. प्रत्येकाला मन मोकळं करावस वाटत. मन मोकळं करण्यासाठी प्रत्येकाचे मार्गही वेगेवेगळे. मी नोंद खरडून सुखावतो. इथ जे स्वातंत्र्य आहे ते समाजमाध्यमांवर नाही. तिथं प्रत्येकाची तोंड वेगवेगळ्या दिशेला. अन राजकीय पक्षांच्या सुळसुळाट झाल्यापासून तिथं कुविचारांचं प्रदूषणच अधिक. त्यामुळे या न त्या कारणाने इकडे येणं होत!

हजारो विषय आहे. हजारो संकल्पना आहेत. अनेक विषयावर मत मांडायचं आहे. पण कुठून सुरवात करावी हेच कळेना. शेवटी आज तो दिवस उगवला. कोणतीही गोष्ट सातत्याने करण्याचा अयशस्वी प्रयत्न मी करीत असतो. चुकून एखाद्या विषयात यश येते. नोंदीत देखील यश येतेय का ते पाहूया.

आजूबाजूच्या घटना अगदी तापदायक आहेत. एकूणच परिस्थती अधिकच गंभीर होत आहे. व्यावसायिक पातळीवर आशेचा किरण दिसतोय. पण देशातील परिस्थितीमुळे मनःशांती नाही. प्रत्येकजण विचारांचा चष्मा घालून जग पाहतोय. मोकळ्या डोळ्याने जे दिसत तेच त्यांना त्यामुळे दिसेनासे झाले आहे. तीच खदखद ह्या नोंदी खरडण्यास प्रवृत्त करते. परिस्थतीत सुधारणा होईना. अन लोकांना सुधारणा व्हाव्या असेही वाटेना. सगळेच चिखलात यथेच्छ डुंबत आहेत. कुणास सांगावे तर तोही चिखलात ये म्हणतो!

सकारात्मक विचार करायचा असं मी रोज ठरवतो. पण रस्त्यांवरील खड्डे दादा चिडवतात. रस्त्यांच्या कडेला असलेले अनधिकृत आडवे तिडवे फलक अन त्यातून डोकावून हसणारे दादा, मामा, नाना, कार्यसम्राट खिजवतात असाच भास होतो.

अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या आणि नियमबाह्य शासकीय कारभार एकेदिवशी माझाही माधव आपटे करणार हे नक्की. तक्रारींना शासन जुमानेना. आजूबाजूची परिस्थिती अन त्यात महागाईने आर्थिक यश देखील गोड लागेना. इतर देशांमध्ये जसा महागाई आणि सार्वजनिक प्रश्नांनी उद्रेक होतो तसा आपल्याकडे होईल का? बर वर्तमानाचं नसेल तर भविष्यासाठी कुठवर आशावादी राहायचं?

मग पुन्हा विचार येतो महाराजांचा. सहा शाह्या असतांना त्यांना भेदून स्वराज्य उभं राहील! एक न अनेक संकटे आली! अन मराठी वाघांनी ती पेलली! अन आताच्या तीन देशांवर स्वराज्य उभं केलं. अन पुन्हा आशेचा किरण दिसतो. लढण्याची उमेद जागी होते. हीच उर्मी आर्थिक आणि सामाजिक स्वराज्य, स्वातंत्र्याची पहाट आणेल! असो, अजूनही शब्दांच्या माळा मनातून ह्या नोंदीत उतरत आहेत! पण अतिरेकही वाईट! वाचकाला छळून कसे चालेल? तूर्तास इथं थांबतो! बाकी बोलूच!!

 

मनोगत

मनोगत

नोंदीच्या रूपाने अनेकदा मनोगत व्यक्त केले. श्राव्य माध्यमातून व्यक्त होण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. अपेक्षा करतो यात झालेल्या चुका पोटात घ्याल. आपल्याला मनोगत कसे वाटते हे नक्की कळवा! आपल्या प्रतिसादाची आतुरतेने वाट पहात आहे!

 

नवी सुरवात

नवी सुरवात

नवी सुरवात अनेकदा झाली. म्हणता म्हणता तास, दिवस, महिने अन वर्षे संपतात. अनुभव सांगतो, वेळ म्हणजे अमूल्य!. त्यापेक्षा मौल्यवान काहीच नाही. आता हे कळायला बराच काळ लोटला. ती गोष्ट वेगळी. हाहा! असो! आता ठरवलेली कामे करायची. त्यातीलच एक भाग म्हणजे नोंदी.

बघायला गेलं तर फारसे मोठे वाटत नाही. परंतु, एका कालखंडानंतर हा मनाचा आरसा होतो. त्या काळाची परिस्थितीचा आरसा! सध्या सगळ्याच पटलांवर निराशेने ग्रासले आहे. आर्थिक संकट ओढवले आहे. परंतु, नेहमीप्रमाणे यातूनही मार्ग निघेल अशी आशा आहे. संकट कायमच येत असतात. संकटे, कधी आल्यावर कळतात. तर कधी त्याची आधीच जाणीव होते. मी काही लेखक नाही. त्यामुळे माझ्या नोंदीतून आपल्याला फारसे ज्ञान मिळणार नाही. परंतु, एक सामान्य मराठी भाषिकांच्या मनाची जाणीव नक्कीच होईल.

खरं तर हा काळ चित्रफितीचा, युट्युबकरांचा! जुन्या काळातील नोंदीकरांचा आता काय निभाव लागणार? तरीही यत्न करतोय! शक्य झाल्यास श्राव्यकर, युट्युबकर होण्याचाही प्रयत्न करेल. गेला काही काळ ट्विटरकर झालेलो! तिथलं जग वेगळच! जगाच्या राजकारणावर व्यक्त होता होता तिथेही राजकारण चालत! आता ते सगळीकडेच चालणार! त्यामुळे नवीन असे काही नाही! पण त्यापेक्षा नोंदीत अधिक स्वातंत्र्य! टीकाकार कमी असतील म्हणून नाही. परंतु मनसोक्त व्यक्त होता येत.

विषयच बंधन नाही. शब्दांची मर्यादा नाही! सुरवातीला अस सुचायचे! नंतर फारशी सुचण्यासाठी अन व्यक्त होण्यासाठी वेळेची मर्यादा यायची. आता पुन्हा कदाचित तो काळ आला आहे. सुचतंय पण अन वेळही द्यावासा वाटतोय! पाहुयात किती काळ हे चालतंय! म्हणून पुन्हा नोंदीच्या रूपाने व्यक्त होण्याचे ठरवलं आहे!

आता पुन्हा सुरवात करतांना, उत्साह आहे. पण उत्साहाच्या पुरात काय बोलायचं हे मात्र सुचेनासे झाले आहे. त्यामुळे आधी मन मोकळं करावं असं ठरवलेल. अनेक विषय आहेत. अनेक विषयांवर अनेक मते आहेत! बऱ्याच गोष्टी सांगायच्या, बोलायच्या आहेत. जगाच्या पटलावर अन स्वतःच्या कौटुंबिक पातळ्यांवर अनेक गोष्टी घडत आहेत. त्यामुळेच की काय, व्यक्त होण्याचा उत्साह निर्माण झाला.

नवी सुरवात करण्याचा अन यावेळी सातत्य ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच होईल! पाहुयात, किती यश मिळतंय ते! मराठी दिनांक थांबलेलं आहे! मराठी दिनांक म्हणजे दैनंदिन दिवस. मराठी महिना, दिवस कोणता ते. तेही पुन्हा सुरु करण्याचा विचार आहे. बाकी बोलूया!!

मार्गशीर्ष कृष्ण १२ १९४३

मार्गशीर्ष कृष्ण १२ १९४३

मार्गशीर्ष कृष्ण १२,

शालिवाहन शके १९४३.
शिवशक ३४८.

३१ डिसेंबर २०२१.

मार्गशीर्ष कृष्ण ११ १९४३

मार्गशीर्ष कृष्ण ११ १९४३

मार्गशीर्ष कृष्ण ११,

शालिवाहन शके १९४३.
शिवशक ३४८.

३० डिसेंबर २०२१
#मराठीदिनांक #म

मार्गशीर्ष कृष्ण १० १९४३

मार्गशीर्ष कृष्ण १० १९४३

मार्गशीर्ष कृष्ण १०,

शालिवाहन शके १९४३.
शिवशक ३४८.

२९ डिसेंबर २०२१.
#मराठीदिनांक #म

मार्गशीर्ष कृष्ण ९ १९४३

मार्गशीर्ष कृष्ण ९ १९४३

मार्गशीर्ष कृष्ण ९,

शालिवाहन शके १९४३.
शिवशक ३४८.

२८ डिसेंबर २०२१.
#मराठीदिनांक #म

मार्गशीर्ष कृष्ण ८ १९४३

मार्गशीर्ष कृष्ण ८ १९४३

मार्गशीर्ष कृष्ण ८,

शालिवाहन शके १९४३.
शिवशक ३४८.

२७ डिसेंबर २०२१.
#मराठीदिनांक #म

मार्गशीर्ष कृष्ण ७, १९४३

मार्गशीर्ष कृष्ण ७

शालिवाहन शके १९४३
शिवशक ३४८

२६ डिसेंबर २०२१
#मराठीदिनांक #म