कसं विसरायचे? आता हे रोजचेच रडगाणे आहे. ते हल्ला करतात. शे दोनशे मारतात. आम्ही नुसते पाहतो. फार फार तर चीडचीड करतो. आणि सरकार ‘शांतता’ पाळण्याचे आवाहन करते. हे सगळे मिडियावाले, राजकारणी त्या हल्ल्यांना ‘भ्याड’ म्हणते. त्यांची दहा सडक छाप, चौथी नापास पोर येतात. आमच्या इथे अंधाधुंदी गोळीबार करतात. आमची लोक मारली जातात. त्यांचे दोन लोक सीएसटीमध्ये नाचत गोळीबार करतात. त्यांच्याकडे ‘ए के फोर्टी सेवन’ आणि आमच्याकडे मेणबत्या. बर ‘कसाब’सा एक सापडतो. झालं! त्याला ३१ कोटींचे ‘पॅकेज’. ज्यांनी पकडले त्या पोलिसांच्या घरी अजून साधी मदतही मिळत नाही. तो थुंकतो काय, हसतो काय. आणि आमची कुत्र्याच्या जातीची मिडिया दिवसभर तेच तेच वर्षानुवर्ष उगाळत बसते. (more…)