टॅग: आनंद

सुख

सुख

सुख मिळवण्यासाठी प्रत्येकजण झगडतो. सुखाची व्याख्या देखील प्रत्येकाची निराळी. अन ते मिळवण्यासाठी काय करावे. यासाठी अनेक मार्ग चोखंदळतात. पण सुख हे मानण्यात असत. हा माझा अनुभव आहे.

व्यक्ती तितक्या प्रकृती. कुणाला पैशात समाधान दिसते. कुणाला अमुक व्यक्ती मिळावी. तर कुणी प्रसिद्धीत आनंदी होते. तर कुणी वस्तूत समाधान शोधते. मी ज्यावेळी नोकरीच्या शोधात पुणे पिंपरी चिंचवड परिसर आलो. त्यावेळी मासिक पाच हजार हे माझे ध्येय होते. दुसऱ्याच महिन्यात दहा हजाराची नोकरी मिळाली. आता लाखभर रुपयांचे देखील कौतुक वाटत नाही! सुखाची नेमकी व्याख्या काय करावी?

गेल्या काही काळात कुणी सुखी आहे हेच मला दिसलंच नाही. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या दुःखात. कुठल्या ना कुठल्या ताणात. बर हा त्रयस्थ व्यक्ती म्हणून अकारण वाटावा असा. पण त्यांच्यासाठी ते महत्वाचे. बर आपण अशा समाजात राहतो. तिथं सल्ले फुकटात मिळतात. त्यामुळे स्वतःहून सल्ला घेणे हा विषयच नाही. त्यात प्रत्येकाची परिस्थिती वेगळी. त्यामुळे, त्यांनाही दोष देण्यात काही अर्थ नाही.

कुटुंब इतकी अंगवळणी पडलेली गोष्ट. त्यामुळे ती एक संस्था आहे, ह्याचाच विसर पडतो. अहमिकेपायी अकारण ताण घरोघरी. कुणीच माघार घेत नाही. दुसरी बाजू समजून घेण्याची क्षमता सर्वांचीच संपली. पडती बाजू हेही दुःखाचं कारण झालंय. काहीजण तर शब्द देखील पकडतात. अन प्रत्येकात नसलेलं दुःख जन्माला घालतात. हेखेखोर नाहीत असे मला म्हणायचे नाही. मुद्दा इतकाच त्यामुळे मिळालेल्या यशाचा देखील आनंद घेता येत नाही.

व्यावसायिकांनी तर सुख म्हणजे वस्तू खरेदी अशी व्याख्या केली आहे. अगदी लहानशा चॉकलेटपासून ते आलिशान घरापर्यंत सगळ्याच गोष्टी म्हणजे आनंद असा समज पसरलेला आहे. शालेय शिक्षणात प्रगतीपुस्तकाच्या अंकात सुख शोधणारे देखील कोट्यवधी आहेत. बर यश मिळवण्याची भूक देखील अमर्याद. त्यामुळे मिळालेले यश देखील तात्कालिक.

माझ्यामते सुख ही आनंदाची आंतरिक भावना. आपण बाह्यजगात शोधतो आणि अधिकच दु:खी होतो. बाहेर सापडणारच नाही. सुख म्हणजे हवं ते मिळणे. पण अनेकदा इच्छा वाढत जातात. त्यात यशापशय असते. दुःख त्रास ताण येतो. काहीजण ह्या गोष्टींमध्ये इतके गुंततात की, मिळालेल्या गोष्टींचे ते सुख उपभोगत नाहीत! अन मग सगळं मिळून देखील समाधान मिळत नाही. त्यामुळे मिळालेल्या यशाचा आनंद घेणे. त्यातूनच पूर्णत्वाची अन सुखाची अनुभूती येते. नाहीतर सुखाच्या नादात दुःखाचे डोंगर ओलांडून देखील समाधान आनंद मिळणार नाही. तूर्तास इतकेच.

साठी

काल परवाच आपल्या देशातील सरदारांची नव्हे तर आपल्या देशाच्या एकमेव लोकसभेची ‘साठी’ साठा उत्तरे ‘सं’पूर्ण झाली. पाच एकशे सरदार लोकसभेत आणि काही ‘तिहारातून’ या ‘सुवर्ण’क्षण अनुभवला. ठरल्याप्रमाणे लोकशाहीचा आणि पर्यायाने लोकसभेचा उदो उदो केला. आमच्या विशेष प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहिती नुसार अनेक सरदारांनी गेल्या ‘साठ’ वर्षात देशात कशी ‘साठमारी’ केली याचे यथोचित आणि सुखासुखे वर्णन केले. (more…)