टॅग: दुष्काळ

दुष्काळ

दुष्काळ

दुष्काळ हा विषय अनेकदा चर्चिला आहे. त्यामुळे याच महत्व कमी झालंय. रोजचंच मढ त्याला कोण रड अशी परिस्थिती आहे. दुष्काळ कधीही एकटा येत नाही. त्यामुळे ह्याच भय अधिक आहे.

आपल्या देशात केवळ तीन टक्के लोकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांहून अधिक आहे. दरडोई कर्जाचा बोजा उत्पन्नाच्या देखील जास्त. त्यात दुष्काळ पडला की त्याने अधिकच संकट वाढते. बर दुष्काळासाठी निसर्ग जबाबदार ठरवणे हा अडाणीपणा आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर दर वर्षाआड दुष्काळ येतो. यासाठी महाराष्ट्र सरकारने दुष्काळ कर देखील लागू केला आहे. आता त्या कराच्या रकमेचे पुढे काय होते हे देवालाही माहित नसावे.

स्पष्ट बोलायचं झालं तर तेल शुद्धीकरणासारखे जमीन नापीक आणि जीवसृष्टी नष्ट करणारे प्रकल्प असोत. वा बेसुमार वृक्षतोड हे सरकारचे पाप आहे. देशातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. पण मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा सरकारी खाक्या संकट अधिक गंभीर करतो. बरं कुठे पुराने गावे आणि शहरे पाण्याखाली जातात. तर कुठे लोहगाडीने पाणी आणावं लागते. बरं एवढा कर घेऊन सरकार नेमकं काय करते हेच मूळ कोडे आहे!

दुष्काळसोबत पाणीटंचाई, तापमानात वाढ, शेती उत्पादनात घट सारख्या गोष्टी येतात. त्यामुळे महागाईत वाढ होते. आणि सर्वसामान्यांचे जीवनमान खडतर होते. अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. उत्तरेतील राज्यात मोठा पाणीसाठा आहे. त्या नद्या दक्षिणेत आणल्या तर हा प्रश्न सुटू शकतो. तिकडे चीनमध्ये हुकूमशाही असूनही तीन मोठे नदीजोड प्रकल्प पूर्ण झाले. आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयाने २००६ साली आदेश देऊनही एकही नदीजोड प्रकल्पाची साध्या बैठकीची वानवा आहे. माझ्यामते, जोवर सरकारमध्ये बौद्धिक दुष्काळ आहे. तोवर दुष्काळ सोडा कोणताही प्रश्न सुटणार नाही. बरं लोकही इतके सरावली आहेत की, त्यांनी सरकारकडून अपेक्षा करणे कधीच सोडले आहे.

नाम सारख्या सामाजिक संस्था उत्तम कामगिरी करतात. पण सरकारला अफाट संपत्ती आणि मनुष्यबळ असूनही ते जमेना. कारण बुद्धीचा दुष्काळ आहे. बर हवामान बदलामुळे वणवा, वादळ, दुष्काळाचा फटका इतरही देशांना बसत आहे. पण ते देश तेथील सरकार हा विषय गांभीर्याने घेते. आपल्याकडे फक्त जाहिरातबाजी. साहेब फक्त उत्सवप्रिय! मूळ प्रश्नांना जोवर सरकार भिडणार नाही तोवर सगळंच अशक्य आहे.

कर घेऊन कर्जबुडवे उद्योगपतींची कर्जे फेडणे हेच जीवितकार्य असल्याप्रमाणे सरकारचे वर्तन आहे. ३९ रुपयांच्या पेट्रोलवर ६७ रुपयांचा कर लावून १०६ ला विकणारे सरकार अब्जावधी रुपयांची संपत्ती केवळ जाहिरात आणि उद्योगपतींच्या तुंबड्या भरण्यात खर्च करीत आहे. वर्षानुवर्षे हा प्रश्न असूनही त्याकडे दुर्लक्ष अराजकतेकडे नेणारे आहे!!

दुष्काळ राजकीय इच्छाशक्तीचा

खरा दुष्काळ राजकीय इच्छाशक्तीचा आहे. सोपं उदाहरण देतो. २००८ साली मुंबई हल्ला झाला. भयंकर चर्चा झाली. अनेकजण मारले गेले. त्यात पोलीस देखील होते.

बरीच खलबते झाल्यावर मुंबई पोलिसांना बुलेटप्रूफ जॅकेट का नाहीत याबाबत विचारणा झाली. आज अकरा वर्षे उलटून देखील मुंबई पोलिसांना बुलेटप्रूफ जॅकेट नाहीत.

अकरा वर्षात सत्तांतर झाले पण मानसिकता तीच. काय अडचण आहे? जॅकेटची किंमत रफाएल विमानांपेक्षा अधिक आहेत का?

बुलेटट्रेनसाठी ८८ हजार कोटींचे कर्जे घेतली. हजारो चौरस किमीचे जंगल उद्धवस्त केले. पुतळ्यासाठी ३००० कोटी रुपये उभे केले जाऊ शकतात. पण बुलेटप्रूफ जॅकेटसाठी शून्य!

सैनिकांच्या बाबतीतही तेच! त्या पुलवामाच्या हल्ल्याआधी गुप्तहेर खात्याने इशारा दिलेला! पण ज्या देशात पंतप्रधानांच्या हौशेखातर विमान खरेदी केले जाऊ शकते तिथे सैनिकांना कसला मान अन कसला जीव!

सैन्याला विमानाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायला काहीच अशक्य नाही. अडचण आहे ती राजकीय इच्छाशक्तीची!

चाळीस सैनिक ठार झाले! त्यांचे दुःख सोडा त्यांच्या हौतात्म्याचा वापर करून घेतला ह्या निर्ढावलेल्या सत्ताधाऱ्यांनी!

देशातील दरवर्षी किमान ४०% भूभाग हा दुष्काळग्रस्त असतो. ६८% भूभाग हा दुष्काळप्रवण क्षेत्र म्हणून देखील चिन्हांकित केला गेला आहे.

पण गेल्या पाच वर्षांत किती धरण बांधली? उत्तर एक असे आहे! गेल्या पाच वर्षात आठ कोटींनी देशातील लोकसंख्येत वाढ झाली अन त्यांच्या तहान भागवण्यासाठी एक प्रकल्प केला!

मुळात देशातील पाणीप्रश्न निव्वळ सत्ताधाऱ्यांनी दाखवलेल्या उदासीनतेमुळे आहे. हाच काय अनेक गोष्टी केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने होत नाहीत.

मग ते सरकारी आरोग्य व्यवस्था असो वा रस्त्यांचे जाळे. बेरोजगारीवर तर न बोललेलं बर! सरकारी बँका बुडवण्याचा चंगच सरकारने बांधला आहे की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती निर्माण केली आहे.

हे प्रश्न राजकीय इच्छाशक्ती नसल्याचे द्योतक आहे. हा इच्छाशक्तीचा दुष्काळ कधी संपणार देव जाणे. देवावरून आठवलं! आमचे लाडके मुख्यमंत्री पाणीप्रश्न सोडवण्यासाठी उज्जेनला गेले आहेत.

जर उज्जेन पाणीप्रश्न सोडवू शकले असते तर मध्यप्रदेशात आजमातीला ४००० गावे दुष्काळग्रस्त का घोषित झाली असती!

सर्व प्रश्न सुटू शकतात. निव्वळ राजकीय इच्छाशक्ती हवी! पैसा उभा केला जाऊ शकतो. कधीकाळी पुणे ते मुंबई प्रवास करण्यासाठी सहा सात तास लागायचे! स्वर्गीय बाळासाहेबांनी इच्छाशक्ती बोलून दाखवली.

अन तत्कालीन बांधकाम मंत्री नितीन गडकरी साहेबांनी द्रुतगती महामार्गाचा प्रकल्प एकहाती पूर्ण केला. तेही सरकारी पैसे न वापरता! म्हणूनच म्हणतो राजकीय इच्छाशक्तीचा दुष्काळ मिटायला हवा!

ऑडिओ ब्लॉग:

आवाजामध्ये नोंद ऐका

दुष्काळ आणि राष्ट्रीय नदीजोड प्रकल्प

दुष्काळ पडू नये म्हणून राष्ट्रीय नदी जोड प्रकल्प भारतासाठी खूप महत्वाचा आहे. आपल्या देशात एकवेळ पाऊस येईल की नाही याबाबत साशंकता असेल पण दुष्काळ अगदी पक्का असतो. यावेळी तर हिवाळ्यातच महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला. (more…)

सकाळ

आमच्या पेपरवाल्याच्या कृपेने रोज ‘सकाळ’ उगवायला जरा उशीरच होतो. कंपनीच्या गडबडीमुळे मग ‘सकाळ’ चाळायला संध्याकाळ होते. आधीच कामाचा थकवा, आणि त्यात पहिल्या पानावर पहा नाहीतर पुरवणीत. जिकडे तिकडे ‘अ’ रे ‘अजितदादा’चा आणि ‘प’ रे ‘पवारांचा’. ते सोडलं तर बाकी वाचनयोग्य अस वर्तमानपत्र.

(more…)