टॅग: प्रगती

शांतता

शांतता

शांतता ही महत्वाची गोष्ट आहे. जिथे शांतता नांदते, तिथे प्रगती निश्चित होते. गोंगाट लक्ष विचलित करतो. गोंधळ, गोंगाट जिथे वाढतात तिथे अशांतता वाढते. अन प्रगतीचा वेग मंदावतो. त्यामुळे शांतता महत्वाची.

शांतता आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्वाची आहे. शांततेमुळे आपल्या कामात लक्ष लागते. अन काम नीट होते. जितके एकाग्रतेने काम होते. तितका त्या कामाचा दर्जा सुधारतो. अशांततेमुळे शाररिक आणि मानसिक त्रास वाढतो. हृदयाचे स्पंदने वाढतात. त्यामुळे शारीरिक समतोल बिघडतो. आणि त्याचा परिणाम शरीराबरोबर कामावर देखील होतो.

सुख आणि समाधान ह्या गोष्टी शांततेमुळे सहजप्राप्त होतात. देवळात गेल्यावर आपल्याला समाधान का मिळते? कारण तिथं शांतता असते. आता तुम्ही या उदाहरणाची तुलना पुण्यातील दगडूशेठ वा मुंबईचा सिद्धिविनायक वा पंढरपूरचा विठ्ठल रुक्मिणीच्या देवळासोबत करू नका. ती प्रसिद्धी पावलेली अन सदा गजबजलेली ठिकाणे आहे. तिथे देवाचं दर्शनऐवजी धक्काबुक्की होईल.

धार्मिक ग्रंथ देखील हीच शिकवण देतात. तेही याचमुळे. माणसेच काय देश देखील अशांत झाले की संहारक होतात. वनातील  श्वापदांप्रमाणे जीवावर उठतात. युद्ध, प्रदूषण वाढवून निसर्गाची व स्वतःची हानी करतात. स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण असावे. त्याखेरीज आपण सुसंवाद साधू शकत नाही. शांतता सुसंवादामुळे टिकतो. अडचणी कमी करतो.

व्यक्तीने समाज आणि समाजाने राष्ट्र घडते. व्यक्ती सर्व गोष्टींचा गाभा आहे. जेवढी आसक्ती कमी तेवढ्या गोष्टी सहजसाध्य होतात. प्रादेशिक असमतोल वाढण्याचे मूळ कारण हेच. असमतोलच जर दूर केला तर वाद येणार कुठून? वाद नसेल तर शांतता टिकवणे शक्य आहे. ऐतिहासिक काळ चाळला तर शूरवीरांच्या भूमीत प्रगती अन शांतता नांदलेली दिसेल. शौर्याच्या बळावर त्यांनी स्वतःची प्रगती केली.

देश, समाज ह्या मोठ्या गोष्टी आहेत. आपण स्वतःला जरी शांत ठेवलं. आपला आजूबाजूचा, घराचा परिसर देखील शांत ठेवला तरी ह्यात आपलेच हित आहे. अकारण चीडचीड. निष्कारण वाद हे हितवाह नसतात. त्यातून शांतता बिघडते. अन प्रगतीला अडसर निर्माण होतो. ह्याचा अर्थ सहन करा असा मुळीच नाही. पण सुसंवादाची कला अवगत केली तर बदल शक्य आहेत. खरतर ह्या गोष्टी वयाच्या एका टप्प्यानंतर आपोआप उमजतात. त्यामुळे फारशी चिंता नसावी. शांततेचे महत्व जरी जाणले तरी अनेक बदल सहजसाध्य आहेत.

सुधारणा

सुधारणा ही सातत्याने घडणारी प्रक्रिया आहे. म्हणजे उदाहरणार्थ गेले वीस वर्षांपूर्वी आपण ज्या पद्धतीने जीवन जगत होतो त्याच पद्धतीने आज जगत नाही. एक अविनाशी प्रक्रिया म्हणा हवं तर!

सुधारणा करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने प्रगती करणे. आपण दिवसात अनेक कामे वारंवार करतो. त्यात बदल घडवून आपण आपला वेळ व श्रम वाचवू शकतो. हेच प्रगतीचे लक्षण आहे.

कालपेक्षा आज केलेले काम उत्तम होण्यासाठी सुधारणा ही आवश्यक असते. त्यासाठी निरीक्षण व योग्य बदल करणे अपेक्षित असते. ती जर घडली नाही तर आपण आपली प्रगती करू शकत नाही.

वा करण्याचे टाळले तर जगाच्या गराड्यात आपण हरवून जातो. मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे दर सहा महिन्याला मोठे बदल घडतात. अनेक गोष्टींची सुधारित आवृत्ती तयार होते.

जो त्या स्वीकारून पुढे जातो त्याला यश हे हमखास मिळते. आपले प्रश्न व अडचणी ह्या सुधारण्याचा गुरुकिल्ली आहेत. प्रश्न वा अडचणी आल्याचं नाहीत तर जीवनात सुधारण्याच्या प्रक्रियेलाच खीळ बसेल.

त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी सातत्याने स्वतःतील बाबींवर स्वतःच निरीक्षण करून त्यात बदल करा. हेच बदल नवे अनुभव देतील. व यशाची कवाडे उघडतील!

अनेकदा कामाच्या व्यापामुळे आपण नवीन गोष्टी करण्याचे टाळतो. अथवा त्यासाठी वेळ काढत नाही. परंतु त्यामुळे सुधारणांची प्रक्रिया खुंटते. पर्यायाने विकासाचा मार्गच थांबतो.

जगात जवळपास मोठ्या कंपन्या स्वतःचा असा एक विभाग (रिसर्च अँड डेव्हलपमेंट) बनवतो जो या आहे त्या पद्धतीत नावीन्य कसे आणता येईल. आपली वेळेची बचत कशी करता येईल. अन उत्पादनाचा दर्जा कसा सुधारता येईल याची काळजी घेतो.

त्यामुळे स्वतःला घडावा. स्वतःच्या गोष्टीत नावीन्य आणण्यासाठी प्रयत्नशील रहा. हाच प्रगतीचा व विकासाचा राजमार्ग आहे. त्यात काही चुका घडल्याचं तर त्याची चिंता करू नका. चुकातूनच माणूस शिकत असतो. उलट चुका न करणाऱ्याला देवच म्हणायला हवे.

सकारात्मक दृष्टीकोन अनेक सुधारण्याचा वाव देतो व स्वतःची प्रगती साधतो. त्यामुळे जगाची चिंता सोडा. स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. अनेक बाबी सुधारता येतील. अन त्यातून अनेक प्रश्नांची उकल होईल.

शाळेत असतांना विनोबा भावेंचा एक धडा वाचलेला. त्याच शीर्षक होत ‘स्वरूप पहा विश्वरूपाची चिंता करू नका’. चला तर मग.

संघर्ष

संघर्ष हा जीवनाचा भाग आहे! अगदी इतका की प्रत्येक सेकंदाला आपण श्वास घेतांना देखील जीवन दोलायमान असते. मग कशासाठी संघर्षांला घाबरायचे? प्रत्येक जीव आपल्या जीवनात आपल्या क्षमतेनुसार संघर्षच करीत असतो. जन्मल्यापासून ते मरेपर्यंत तो चालतो. (more…)

सुधारणा

स्वतःमध्ये सुधारणा करणे म्हणजेच प्रगती करणे. अनेकदा आपण अनेक गोष्टी ठरवतो. त्यासाठी प्रयत्न करतो. कधी त्या यशस्वी होतात तर कधी अयशस्वी तर कधी त्या गोष्टी करणेच राहून जाते! असे होते कारण आपल्याला एकतर त्या गोष्टी करायच्या नसतात. किंवा आपल्याला त्यात फारसे काही जमत नसते. (more…)