टॅग: मराठी

मार्गशीर्ष ११, १९४३

मार्गशीर्ष शुद्ध ११

शालिवाहन शके १९४३
शिवशक ३४८

१४ डिसेंबर २०२१

#मराठीदिनांक #म

मार्गशीर्ष १०, १९४३

मार्गशीर्ष शुद्ध १०

शालिवाहन शके १९४३
शिवशक ३४८

१३ डिसेंबर २०२१

#मराठीदिनांक #म

मार्गशीर्ष ९, १९४३

मार्गशीर्ष शुद्ध ९

शालिवाहन शके १९४३
शिवशक ३४८

१२ डिसेंबर २०२१

#मराठीदिनांक #म

मार्गशीर्ष ८, १९४३

मार्गशीर्ष शुद्ध ८

शालिवाहन शके १९४३
शिवशक ३४८

११ डिसेंबर २०२१

#मराठीदिनांक #म

मार्गशीर्ष ७, १९४३

मार्गशीर्ष शुद्ध ७

शालिवाहन शके १९४३
शिवशक ३४८

१० डिसेंबर २०२१

#मराठीदिनांक #म

मार्गशीर्ष ६, १९४३

मार्गशीर्ष शुद्ध ६

शालिवाहन शके १९४३
शिवशक ३४८

९ डिसेंबर २०२१

#मराठीदिनांक #म

मार्गशीर्ष शुद्ध ५, १९४३

मार्गशीर्ष शुद्ध ५

शालिवाहन शके १९४३
शिवशक ३४८

८ डिसेंबर २०२१

#मराठीदिनांक #म

मार्गशीर्ष शुद्ध ४, १९४३

मार्गशीर्ष शुद्ध ४

शालिवाहन शके १९४३
शिवशक ३४८

७ डिसेंबर २०२१

#मराठीदिनांक #म

मराठी दिनांक – मार्गशीर्ष ३

मार्गशीर्ष शुद्ध ३

शालिवाहन शके १९४३
शिवशक ३४८

६ डिसेंबर २०२१

राष्ट्रभाषा मराठी

अठराव्या शतकात भारताची राष्ट्रभाषा मराठी होती. मराठेशाहीच्या टापा ज्यावेळी अफगाणिस्थानाच्या सीमेवर पडत होत्या त्यावेळी देशाचा सर्व व्यवहार मराठीमधून चालत असे. त्याकाळी नामधारी दिल्ली ही राजधानी मुघलांच्या ताब्यात होती.

तर देशाचा सर्व व्यवहार तत्कालीन मराठेशाहीच्या राजधानी पुण्यातून चालत असे. पुढे ब्रिटिशांनी चाळीस वर्षे मराठ्यांशी लढून देशावर ताबा मिळाला. व देशाची शासकीय व्यवहाराची भाषा इंग्रजी झाली! मुघलांनी फारसी (पर्शियन) वापरलेली. तर मराठेशाहीच्या काळात सर्व शासकीय व्यवहार मराठीतून होत असे. त्यासाठी व्यवहारकोश निर्मितीचे काम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवरायांच्या काळातच पूर्ण झाल्याने मराठी भाषेला सुवर्णकाळ प्राप्त झाला होता.

ब्रिटिशांच्या ताब्यात देश गेल्यावर कारकुनी कामासाठी शाळांची सुरवात देशात झाली. अन मराठीच नव्हे तर सर्व भारतीयांना ब्रिटिशांनी सांगितलेल शिक्षण शिकवले गेले! त्यातून त्यांनी मानसिक गुलामांची अशी एक पिढी निर्माण केली की ती बुद्धिवादी असेल परंतु मानसिकरीत्या ब्रिटिशांची गुलाम असेल. एवढ्या खंडप्राय देशाला सांभाळण्यासाठी त्यांनी ते केले.

दुर्दैवाने ब्रिटीशांनंतर अजूनही तेच शिक्षण पद्धती सुरु राहिल्याने आजही कारकुनी काम करू शकणाऱ्यांची व ब्रिटिशांची मानसिक गुलामी करणारी पिढीचाच सर्वत्र पूर आलेला आहे. त्याचा वापर तत्कालीन हिंदी भाषिक नेत्यांनी स्वतःच्या भाषेसाठी करून घेतला. व राष्ट्रभाषा नसतांनाही गेल्या ७५ वर्षांपासून हिंदी भाषा राष्ट्रभाषा असल्याचा खोटा प्रचार सरकारी खर्चाने केला. दुर्दैवाने आजही हा समज जनमानसात पसरलेला असून त्यामुळे इतर भारतीय भाषा मृत्युमुखी पडत आहेत.

ब्रिटिशांकडून स्वातंत्र्याच्या वेळी भारतातील ७८० हुन अधिक भारतीय भाषा बोलल्या जायच्या. आज त्यातील २२० हुन अधिक भाषा मृत झाल्याचा अहवाल भारत सरकारच्या भाषा विभागाने याआधीच प्रसिद्धीस दिलेला आहे. तसेच हीच परिस्थिती पुढे कायम राहिल्यास येत्या पन्नास वर्षात तेवढ्याच भाषा मृत होतील असाही अंदाज व्यक्त केलेला आहे.

खरं तर अखंड भारतावर राज्य करणाऱ्या मराठीला पुनः राष्ट्रभाषा म्हणून दर्जा मिळणे आवश्यक होते. परंतु, ब्रिटिशांच्या शिक्षणपद्धतीमुळे गुलाम झालेल्या तत्कालीन मराठी भाषिकांनी याचे स्मरणही झाले नाही! परंतु, तीची पुनर्स्थापना करण्याचे ध्येय ठेवल्यास जगभरातील १५ कोटी मराठी भाषकांना काहीही अशक्य नाही.

दोन हजार वर्षांपासून मनगटाने देशाचे व बुद्धी अन व्यवहार चातुर्याने आर्थिक संपन्नता निर्माण करणाऱ्या मराठी भाषिकांना सगळं शक्य आहे. असे नसते तर इसवीसनाच्या सुरवातीला शकांच्या लक्षावधींच्या फौजेला त्यांनी हरवले नसते! अन ब्रिटिशांना बंगालातून भारतात प्रवेश करणे क्रमप्राप्त झाले नसते. अन मुघलांचे साम्राज्यही नष्ट झाले नसते!

राष्ट्रभाषा मराठी करायची असेल तर सुरवातीला आपण ती राष्ट्रभाषा आहे असं स्वतःला व आपल्या वर्तुळातील इतरांना सांगणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपण हे बिंबवणार नाही तोवर पुढचे पाऊल टाकता येणार नाही.