टॅग: विचार

सकारात्मकता

सकारात्मकता

सकारात्मकता ही आजच्या काळातील सर्वात कठीण बाब. नकारात्मक राहावे अशी परिस्थिती. महागाई, रस्त्यांची दुरावस्था, स्त्रियांवर अत्याचार, गुन्हेगारी. यामुळे कठीण झालं आहे.

कोरोनाच्या काळातील अनुभव. त्याकाळी कोरोनाने मरणाऱ्या लोकांपेक्षा त्याच्या भीतीनं अधिकजण गेले. शासकीय आणि वृत्तसंस्थांनी ती भीती पराकोटीला नेली. माझ्या घरात वृत्तवाहिन्या फारशा लोकप्रिय नसल्याने त्रास कमी झाला. भीती पाठी ब्रह्मराक्षस. हे खरंय. नवीन गोष्टी शिकणे हा सकारात्मक राहण्याचा सोपा उपाय. नवीन गोष्टी सकारात्मकता निर्माण करतात. नाविण्य नसेल तर नकारात्मकता वाढते. हे माझे निरीक्षण आहे. नकारात्मकता वाद आणि अशांततेची जननी आहे. अन त्यातून क्वचितच चांगले साध्य होते. बदल देखील आयुष्य सुकर करतात. मग ते बदल कितीही लहानसे का असेनात.

प्रकाश देखील सकारात्मता वाढवतो. जिथं अंधार तिथं आरोग्याला धोका. जिथं आरोग्य नाही तिथं समाधान नाही. आणि जिथं समाधान नाही तिथं नकारात्मता वाढते. समाधान हा मोठा विषय आहे. त्यावर कधीतरी सविस्तर चर्चा करूयात. थोडक्यात, प्रकाश महत्वाचा आहे. सातत्याने एकाच गोष्टीचा विचार करणेही त्रासदायक असते. एकच विचारांमुळे मानसिक आरोग्य बिघडते. अतिरेक वाईटच असतो. मनात विचार येतात. विचार मनाला पटतात. अन त्यातून कृती होते. अन कृतीतून बदल घडतात. त्यामुळे चांगले विचार अंगी बाळगायला हवे.

अशा अनेक लहान लहान गोष्टीतून सकारात्मकता वाढू शकते. चांगली संगत आयुष्याला आकार देते. चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्याने सकारात्मक दृष्टिकोन बनतो. त्यामुळे चांगल्या संगतीत राहावे. दिवसाचे चक्र लवकर सुरु केल्याने देखील अनेक लहान सहान प्रश्न सुटतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. अनेकदा वेळेअभावी अनेक गोष्टी करायच्या राहतात. त्यामुळे लवकर उठणे फायद्याचे ठरते. स्वतःसाठी वेळ दिला तर चिंतन करणेही शक्य होते. काम रेंगाळली की ताण येतो. ताण नकारात्मकता आणि चिडचिडेपणा वाढवते. त्यामुळे सकाळी लवकर उठण्याची सवय चांगली आहे. सुखद सकाळ दिवस चांगला जाण्यास मदत करतो.

नकारात्मकता हा रोग आहे. असे चाणक्य सांगतो. कितीही कठीण परिस्थिती येवो. सकारात्मकच राहायला हवे. दिल्ल्लीश्वरो वा जगदीश्वरोवा म्हणणारे असतांना सहा शाह्या उलथून मराठी स्वराज्य उभे ठाकले. ह्यापेक्षा प्रेरणादायी अन्य काय गोष्ट? त्यामुळे कायम सकारात्मकच रहा. हाच यश मिळवण्याचा मार्ग आहे. यश म्हणजे काय हाही एक मोठा विषय आहे. त्यावर नंतर सविस्तर बोलूया.

जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत – नेल्सन मंडेला

नेल्सन मंडेला विचार!

जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत ते नेहमी अशक्य वाटतं! – नेल्सन मंडेला

चांगले कर्म चांगलेच फळ देतात! ~ चाणक्य

चाणक्य विचार :
कधी कुणा दुसऱ्या व्यक्तीसमोर चांगला बनण्याचा प्रयत्न करू नका! आपण एकटे आलो आहोत! जाणार सुद्धा एकटेच! जसे कर्म करू तसे फळ मिळेल! जे घडून गेलं त्याला विसरून जा! जे करत आहेत त्यावर विश्वास ठेवा! जे होईल त्याची चिंता सोडून द्या! बस तुम्हाला फक्त कर्म करायचे आहे! त्याला पुरस्कार देण्याचे कार्य भाग्याचे आहे! करेल ते! चांगले कर्म चांगलेच फळ देतात! ~ चाणक्य

https://twitter.com/hemantathalye/status/941728058238689282

एकदा तरी

एकदा तरी! मी स्वतःला बदलायचा प्रयत्न करीत आहे. गेले दोन दिवस खूपच ‘कठीण’ गेले. कठीणच शब्द योग्य आहे. क्षणाक्षणाला सगळेच बदलते आहे. मी तिचा विचार कमी करायचा खूपच पर्यंत करीत आहे. यार पण हे प्रेम, एखाद्या आगीप्रमाणे आहे. मनाची मशाल उलट केली तरी ही आग पुन्हा वरच्या दिशेने. काय करू? ती दिसली की, मी मनात ‘तिला आपल्याबद्दल काहीच वाटत नाही’ असा जप सुरु करतो. किती कठीण आहे यार हे माझे मन. माझेच ऐकत नाही आहे. (more…)