टॅग: वैशिष्ट्यपूर्ण

भेदभावाचे अर्थकारण

भारत माझा देश आहे व सर्व भारतीय माझे बांधव आहे हा शुद्ध गैरसमज वाटावा अशा गोष्टी घडत आहेत. अर्थकारण देखील तेच! जेव्हा व्हिडीओकॉनचे धूत नियमाप्रमाणे कर्ज काढतात आणि त्याचे हप्ते देखील वेळेवर भरतात. तरीही इन्कम टॅक्स विभाग त्यांना समन्स पाठवतो व चौकशीला बोलावतो! पन्नास कोटीसाठी डीएसकेनां कारागृहात जावे लागते. त्याउलट नऊ हजार कोटींचे कर्ज फेडू न शकलेल्या अनिल अंबानींना ना कारागृहात जावे लागते न इन्कम टॅक्सकडून साधे पत्र जाते. ह्याला भेदभाव नाही तर काय म्हणायचे? (more…)

ग्रामगीता – अध्याय पहिला १३

ग्रामगीता:

दुसर्‍याची उणीव पाहतां हसणें ।
दुसर्‍याची आपत्ति पाहून पळणें ।
दुसर्‍याचें वैभव देखोनि जळणें ।
होतें ऐसें ॥१३॥

– संत तुकडोजी महाराज

(more…)

निष्पाप सलमान

खरंच किती अन्याय ह्या निष्पाप सलमान खानवर! न्यायसंस्था खंबीर आहे म्हणून बरं, नाहीतर ह्या क्रूर लोकांनी दयावान व भारताचा ब्लॅक डायमंड व आमच्या लाडक्या सलमानला त्रासून मारले असते. नाही मला तुम्ही सांगाच आता! फुटपाथवर गाडी घातली मग काय असं मोठं केलं. मान्य आहे आमच्या भाईने दारू ढोसलेली. बरं गाडी खाली कशाला यायचं लोकांनी? चूक त्या गरिबांची आहे. उलट आमच्या भाईनीं देश हिताचेच काम केलं. आता फुटपाथवर झोपायला काय बसायलाही लोक घाबरतात. आणि कुणी बसलेच तर झोपेतही सलमाची स्वप्न पडतात. देशकार्य केलं म्हणून पुरस्कार द्यायचा सोडून केस टाकली? (more…)

भाषा

भाषा /बोलण्याची पद्धत महत्त्वाचीच! थोड्या वेळापूर्वीच सोसायटीतील एका सभासदाच्या भावाचा फोन आलेला. प्रसंग अगदी सोपा! सोसायटीच्या भिंतींवर दोन दिवसापूर्वी परस्पर दोन तीन ठिकाणी स्वतःची सदनिका विकण्याची जाहिरातीचे पत्रक लावलेली. माझ्या सांगण्यावरून सुरक्षारक्षकाने ती काढलेली. अपेक्षेप्रमाणे साहेबांचा फोन आलेला. मी देहूरोड इथे राहतो. मला न विचारता आपण ती पत्रके कशाला काढलीत वगैरे वगैरे (खरं तर संस्थेच्या अध्यक्ष या नात्याने मी विचारायला हवं होत!). मला खरं तर हसावं की रडावं तेच समजेना. साहेबांना ‘सेक्रेटरीशी बोला’ असं म्हणून मी फोन कट केला. (more…)

कायदा आणि आपण

खरं तर कायदा बद्दल काही बोलावं असं मनात नव्हतं. परंतु गेल्या काही काळापासून हे वातावरण या देशात आहे ते पाहता बोलणं भाग आहे. देशाला पुढे जायचं असेल तर तशी इच्छा आधी इथल्या लोकांमध्ये असणे जरुरी आहे. मी रोज घरापासून माझ्या कचेरीत येण्याच्या रस्त्यांमध्ये चौकाचौकात असलेल्या सिग्नल तोडणाऱ्यांचे प्रमाण पाहतो. घरी जातांना फुटपाथला लागून असलेल्या रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या दुचाकी आणि चारचाकी उभ्या गाड्या पाहतो. हातगाड्या आणि फेरीवाल्यांना पाहतो. पैशाशिवाय सरकारी काम होणार नाही अशी धारणा असलेल्या माझ्या सोसायटीतील सभासदांना पाहतो. रस्त्याच्या कडेला असलेला कचरा पाहतो. कचरा टाकणाऱ्या आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना पाहतो. मग मनात प्रश्न उभा राहतो की खरंच आपल्या लोकांची मानसिकता नेमकी काय आहे? (more…)