टॅग: व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व चांगले असायलाच हवे. ते व्हावं यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. त्याचा प्रभाव अधिक. जितके तुम्ही प्रभावी तितकी तुमची पत वाढते. जितकी पत तितकी प्रसिद्धी. आपण आपल्या आर्थिक सामाजिक दृष्टिकोनातून पाहूया.

स्वामी विवेकानंदांच्या मते, दुसऱ्या व्यक्तीवर आपल्या व्यक्तिमत्वाचा दोन, विचारांचा एक तृतीयांश प्रभाव पडतो. त्यामुळेच शास्त्रज्ञ, विचारवंत कितीही मोठा मुद्दा मांडला. तरी धार्मिक, राजकीय व्यक्तीच्या मानाने तो कमी ठरतो. कारण लोकांना जे प्रत्यक्ष दिसते. त्यावरून ते व्यक्तीचे चारित्र्य ठरवतात. समाजात सर्व प्रकारची माणसे असतात. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. चांगली शरीरयष्टी व्यक्तिमत्व सुधारते. योग्य पेहराव आणि चांगली देहबोली. हे इतरांवर अधिक परिणाम करतात.

आता चांगल्या शरीरयष्टीसाठी व्यायाम गरजेचा आहे. अन माझ्यामते तेच सर्वात अवघड आहे. कारण स्थूल शरीराला व्यायाम शत्रू वाटतो. मी तर व्यायाम करेन असे ठरवतो. पण त्यात यश फारसे लाभत नाही. हे झाल्यास पुढील बाबी बक्षीस स्वरूपात मिळतात. कारण चांगली शरीरयष्टी मनही कणखर बनवते. मन कणखर आव्हाने पेलण्यास सक्षम होते. आव्हानांना टाळून यश मिळत नाही. स्वभाव देखील सुधारतो. आत्मविश्वास दुणावतो. न्यूनगंड कमी होतो. ताणतणाव, चिडचिड कमी होते. इतके सारे व्यायाम देते. प्रभाव पडतो. इतका की, एखादा खोड्या काढणारा देखील चार वेळा विचार करतो. हा माझा अनुभव आहे.

चांगला व साजेलसा पेहराव. हेही व्यक्तिमत्वाचा एक पैलू आहे. परिसराला, वातावरणाला आणि आपल्या शरीराला साजेल असा पेहराव उत्तम असतो. दुसऱ्याची नक्कल करण्यात काहीच अर्थ नाही. कारण प्रत्येक व्यक्ती आणि भोवतालची परिस्थिती वेगळी असती. आजकाल कनिष्ठ महाविद्यालये, जाडजूड काळे डगळे सक्तीचे करीत आहे. एकतर आपण पृथ्वीवरील उष्ण कटिबंधीय प्रदेशात आहोत. अन त्यात तसे कपडे. शरीराची लाही लाही करणार. मग तो व्यक्ती कसा दुसरा विचार करू शकणार? याचा सारासार विचार शिक्षण संस्थांनी करावा.

चांगल्या वागणे व्यक्तिमत्व सुधारणेचे एक प्रतीक आहे. चांगले म्हणजे सहाय्य करणे. इतरांना प्रोत्साहन देणे. मदत करणे. किमान एक चांगला श्रोता होणे. शक्य असल्यास मोजक्या शब्दात मार्गदर्शन. विरोधी मतांचा देखील सन्मान करणे. लोकांना मदत करणारे लोक प्रिय असतात. अशी लोक मिळणे आजकाल देवाइतके दुर्मिळ झाले आहे.

सकारात्मक विचारसरणी व्यक्तिमत्वात भर घालते. ध्येय गाठण्यासाठी याचा उपयोग होतो. सकारात्मकता विचारांचा आवाका वाढवते. नवीन गोष्टी शिकणे हेदेखील सकारात्मक विचार अंगी रुजण्यास सहाय्यक ठरतात. अन ह्यामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होतो. व प्रभाव वाढतो. माझ्यामते, सुरवात केली तर यात भरपूर वाव आहे. त्यामुळे, निसंकोचपणे स्वरूप पहा. अन त्यात बदल घडवा. आपणच आपले शिल्पकार आहोत!!