टॅग: स्वराज्य

शिवराय

शिवराय

शिवराय म्हणजे स्वराज्यसूर्य. कधीकाळी महाराजांचा एवढा गवगवा का? राजकारण सार असं वाटायचं. पण वैयक्तिक आयुष्यातील अडचणी पहिल्या. मग महाराजांचे मोठेपण पटले. प्रत्येकाने महाराजांचा आदर्श घ्यावा.

लहानपणी घरी जाणता राजा नाटकाच्या श्राव्यफिती होत्या. अगदी पाठ झालेलं. पुढे शिक्षण अन नोकरीसाठी पिंपरी चिंचवडमध्ये येणं झालं. सुरवातीचा काळ कठीण गेला. पुढे यशाचा काळ सुरु झाला. सुरवातीला दोन खोल्यांचं घर घेतलं. ते विकून तीन खोल्यांच घेतलं. भागातील पाणीप्रश्न वाढला. ते विकून नव्या ठिकाणी तीन खोल्यांचं घर घेतलं. गाडी, घर सगळं अगदी छान. नोकरीतील घुसमट कुणाला होत नाही? एके दिवशी राजीनामा देऊन स्वतःची संस्था उभी करण्याचा विचार केला.

अन तिथून खरं आयुष्य जगू लागलो. आर्थिक बाजू जेमतेम. शिते संपले म्हटल्यावर भुते कशाला राहतील? सोबत आजुबाजेचे वलय संपले. जीवनाच्या घाट वाटा मध्यरात्रीशी झुंज सुरु झाली. रोज एक नवीन संकट. जितकं स्वातंत्र्य तितकाच ताण. गृहकर्जरूपी औरंगजेब नाकाबंदी करू लागला. अचानक येणारी संकटे अक्षरशः धूळधाण उडवू लागली. काळरात्र संपेनाचं. सगळीकडे ताणच ताण. ताणाने एक आठवडा आजारीच पाडले.

व्यायाम नाही. आर्थिक अडचणी अन त्यात नवीन उद्योग चालू ठेवण्याचे आव्हान. मग आजारपण येणारच होते. सहज विचार करत असतांना महाराजांचा विचार आला. चार माणसांचे कुटुंब सांभाळणे इतकं कठीण असेल. तर महाराजांनी तीन लाखांच सैन्य. एक लाख घोडदळ. साडेतीनशेहुन अधिक गड कसे सांभाळले असतील. सहा सहा क्रूर शाह्या. त्यांच्यासमोर मूठभर सहकारी. कसा चमत्कार केला. उत्सुकता वाढली. इतिहासकारांच्या व्याख्यानातून महाराजांबाबत अधिकच कुतूहल वाढू लागले.

नुसत्या लढाया नव्हे तर शिवरायांचे दुर्ग विज्ञान. बलाढ्य गनिमांवर गनिमी चाल. वेगाचा व व्यक्तींचा अचूक उपयोग. अनेकदा संकटे आली. पण लढा सुरूच राहिला. बुद्धीचा आणि शक्तीचा अद्भुत संगम म्हणजे शिवराय. पंधराव्या वर्षी स्थापन केलेली स्वराज्य नावाची संस्था पन्नाशीत ३५० हुन अधिक गडांची अन तळांची झाली. तीन लक्ष सहकारी. मग काय माझ्या मनातील ताण कुठं गेला माहित नाही. अन आजवर सापडला नाही.

शिवरायांनी याच भूमीत स्वराज्य उभे केले. तेही आपल्याप्रमाणेच ह्याच मातीत जन्मले. मग त्यांच्या पाइकांना काय अशक्य? मग आयुष्याशी लढतोय. तेही निर्भीडपणे. आर्थिक काय सर्वच आघाड्यांवर यश मिळेपर्यंत लढा सुरु राहील. महाराजांनी परिस्थिती समोर हार मानली नाही. महाराजांच्या नावानेच दगड देखील जिवंत होईल. मग आपण तर माणसे आहोत. छत्रपतींचे नाव घेऊन पहा बारा हत्तीचे बळ संचारेल. शिवराय हा मंत्र आहे. महाराज म्हणजे मराठी माणसांसाठी महामृत्युंजय मंत्र!!

नोंदी

नोंदी

नोंदी लिहिण्यासाठी सुचावं लागत. अन त्याहून मोठं त्यासाठी वेळ द्यावा लागतो. मध्यंतरीच्या बराच मोठा काळ दोन पैकी एक गोष्ट नसल्याने काहीही होत नव्हतं. अगदी ठरवून देखील. परंतु, गेल्या काही दिवसातील परिस्थिती पुन्हा लिहिण्यास उद्युक्त करीत आहे.

एक चीड, विचार मनात वादळ निर्माण करतो. अन नोंद तयार होते. प्रत्येकाला मन मोकळं करावस वाटत. मन मोकळं करण्यासाठी प्रत्येकाचे मार्गही वेगेवेगळे. मी नोंद खरडून सुखावतो. इथ जे स्वातंत्र्य आहे ते समाजमाध्यमांवर नाही. तिथं प्रत्येकाची तोंड वेगवेगळ्या दिशेला. अन राजकीय पक्षांच्या सुळसुळाट झाल्यापासून तिथं कुविचारांचं प्रदूषणच अधिक. त्यामुळे या न त्या कारणाने इकडे येणं होत!

हजारो विषय आहे. हजारो संकल्पना आहेत. अनेक विषयावर मत मांडायचं आहे. पण कुठून सुरवात करावी हेच कळेना. शेवटी आज तो दिवस उगवला. कोणतीही गोष्ट सातत्याने करण्याचा अयशस्वी प्रयत्न मी करीत असतो. चुकून एखाद्या विषयात यश येते. नोंदीत देखील यश येतेय का ते पाहूया.

आजूबाजूच्या घटना अगदी तापदायक आहेत. एकूणच परिस्थती अधिकच गंभीर होत आहे. व्यावसायिक पातळीवर आशेचा किरण दिसतोय. पण देशातील परिस्थितीमुळे मनःशांती नाही. प्रत्येकजण विचारांचा चष्मा घालून जग पाहतोय. मोकळ्या डोळ्याने जे दिसत तेच त्यांना त्यामुळे दिसेनासे झाले आहे. तीच खदखद ह्या नोंदी खरडण्यास प्रवृत्त करते. परिस्थतीत सुधारणा होईना. अन लोकांना सुधारणा व्हाव्या असेही वाटेना. सगळेच चिखलात यथेच्छ डुंबत आहेत. कुणास सांगावे तर तोही चिखलात ये म्हणतो!

सकारात्मक विचार करायचा असं मी रोज ठरवतो. पण रस्त्यांवरील खड्डे दादा चिडवतात. रस्त्यांच्या कडेला असलेले अनधिकृत आडवे तिडवे फलक अन त्यातून डोकावून हसणारे दादा, मामा, नाना, कार्यसम्राट खिजवतात असाच भास होतो.

अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या आणि नियमबाह्य शासकीय कारभार एकेदिवशी माझाही माधव आपटे करणार हे नक्की. तक्रारींना शासन जुमानेना. आजूबाजूची परिस्थिती अन त्यात महागाईने आर्थिक यश देखील गोड लागेना. इतर देशांमध्ये जसा महागाई आणि सार्वजनिक प्रश्नांनी उद्रेक होतो तसा आपल्याकडे होईल का? बर वर्तमानाचं नसेल तर भविष्यासाठी कुठवर आशावादी राहायचं?

मग पुन्हा विचार येतो महाराजांचा. सहा शाह्या असतांना त्यांना भेदून स्वराज्य उभं राहील! एक न अनेक संकटे आली! अन मराठी वाघांनी ती पेलली! अन आताच्या तीन देशांवर स्वराज्य उभं केलं. अन पुन्हा आशेचा किरण दिसतो. लढण्याची उमेद जागी होते. हीच उर्मी आर्थिक आणि सामाजिक स्वराज्य, स्वातंत्र्याची पहाट आणेल! असो, अजूनही शब्दांच्या माळा मनातून ह्या नोंदीत उतरत आहेत! पण अतिरेकही वाईट! वाचकाला छळून कसे चालेल? तूर्तास इथं थांबतो! बाकी बोलूच!!

 

संकट आणि आपण

संकट आणि आपण! संकट येतात आणि जातात! संकटे आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. तरीदेखील आपण संकट आले म्हणून घाबरतो!

मला सांगा जगात असे कोण आहे ज्यावर कधीच संकट आले नाही? असे कोण आहे ज्याचे जीवन सुखात गेले? मुळात संकटे ही सुखाचे महत्व समजावतात व आयुष्याला नवी दिशा देतात.

दिवसानंतर रात्र व रात्रीनंतर पुन्हा दिवस येतो. त्यामुळे जर आयुष्य संकटांनी अंधारले असेल तर लक्षात ठेवा आनंदनाचा प्रकाश येण्याची वेळ झाली आहे!

कोणतीही गोष्ट कधीही कायम नसते! त्यामुळे संकटे येतील जातील! त्यासाठी मनाची तयारी हेच सर्वात मोठं हत्यार आहे! शिवरायांनी ज्यावेळी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेली त्यावेळी त्यांचे वय तरी असे किती होते? अन त्यांचे स्वप्न तर हिमालयाएवढे!

स्वराज्य स्थापन झाल्यानंतर देखील थोडीच संकटे थांबली! अनेकदा जीवावर बेतेल अशी व्यवस्था नियतीने केलेली! पण स्वराज्य उभे राहीले व ते पुढे जाऊन शत्रूचा कर्दनकाळ ठरले! मग विचार करा! आपल्यावर असलेले संकट त्याहून मोठे आहे का?

संकटावर मात केली जाऊ शकते! संकटे देखील संकटात सापडतात! कोणतेही संकटावर उपाय हा असतोच! इवलीशी मेणबत्ती अंधाराला चिरून टाकते! आपण तर माणसे आहोत!

संकटे आली म्हणून कोणीही कमी होत नसतो! उलट संकटे आपल्याला अधिक मजबूत बनवतात! आपली परीक्षा आहे असे समजा! लोखंडाला हवा तो आकार घेण्यासाठी आगीच्या भट्टीत तावून सुलाखूनच जावे लागते!

रामाला देखील वनवासात जावं लागलेलं! संकटे ही प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात! त्यामुळे माझ्यासोबतच असं का हा विचार मनातून काढून टाका! त्याच्याशी लढा! संकटांवर तुटून पडा! संकटे संकटात नक्की येतील!

आयुष्य सुंदर आहे! नसेल तर ते बनावता येऊ शकते! आपण सकारात्मक राहिलो तर नक्कीच बदल घडविला जाऊ शकतो! संकटे केवळ आपल्या क्षमतेची चाचणी घेत असतात! संकटे कितीदा आले तरी ते आपल्या फायद्याचेच! आपण स्वतःची सुधारणा करण्याची उत्तम संधी!

त्यामुळे संकटे आली म्हणून किंवा नाही आली म्हणून आयुष्यात स्वतःला सुधारणांनी सुधारा! आयुष्य एकदाच मिळते! हे कधीही विसरू नका! संकटकाळात स्वतःला कधीही कमी समजू नका. मेहनतीवर संपूर्ण लक्ष केंद्रित करा!

कोणताही विजय दैनंदिन केलेल्या श्रमाचे फळ असते व हेच सत्य आहे! जीवनाला आकार देण्यासाठी ही संकटे येतात!

राजे

एक माणूस सिंहासारखा. एक राजा पहाडासारखा. त्याच आयुष्य म्हणजे एका स्वातंत्र्याची विजयगाथा. तो माणूस पण राष्ट्रासाठी देव. त्याचे मोठेपण, त्याची दूरदृष्टी. त्याच्या योजना. त्याची शून्यातून सर्वस्व उभे करण्याची ताकद. त्या महान व्यक्तीची आज जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या एकूणच महान शौर्यगाथा भरलेल्या जीवनाचा आढावा माझ्यासारख्या कसपटाला प्राप्त होणे हे अनमोल भाग्य. (more…)