टॅग: कर

दुष्काळ

दुष्काळ

दुष्काळ हा विषय अनेकदा चर्चिला आहे. त्यामुळे याच महत्व कमी झालंय. रोजचंच मढ त्याला कोण रड अशी परिस्थिती आहे. दुष्काळ कधीही एकटा येत नाही. त्यामुळे ह्याच भय अधिक आहे.

आपल्या देशात केवळ तीन टक्के लोकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांहून अधिक आहे. दरडोई कर्जाचा बोजा उत्पन्नाच्या देखील जास्त. त्यात दुष्काळ पडला की त्याने अधिकच संकट वाढते. बर दुष्काळासाठी निसर्ग जबाबदार ठरवणे हा अडाणीपणा आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर दर वर्षाआड दुष्काळ येतो. यासाठी महाराष्ट्र सरकारने दुष्काळ कर देखील लागू केला आहे. आता त्या कराच्या रकमेचे पुढे काय होते हे देवालाही माहित नसावे.

स्पष्ट बोलायचं झालं तर तेल शुद्धीकरणासारखे जमीन नापीक आणि जीवसृष्टी नष्ट करणारे प्रकल्प असोत. वा बेसुमार वृक्षतोड हे सरकारचे पाप आहे. देशातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. पण मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा सरकारी खाक्या संकट अधिक गंभीर करतो. बरं कुठे पुराने गावे आणि शहरे पाण्याखाली जातात. तर कुठे लोहगाडीने पाणी आणावं लागते. बरं एवढा कर घेऊन सरकार नेमकं काय करते हेच मूळ कोडे आहे!

दुष्काळसोबत पाणीटंचाई, तापमानात वाढ, शेती उत्पादनात घट सारख्या गोष्टी येतात. त्यामुळे महागाईत वाढ होते. आणि सर्वसामान्यांचे जीवनमान खडतर होते. अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. उत्तरेतील राज्यात मोठा पाणीसाठा आहे. त्या नद्या दक्षिणेत आणल्या तर हा प्रश्न सुटू शकतो. तिकडे चीनमध्ये हुकूमशाही असूनही तीन मोठे नदीजोड प्रकल्प पूर्ण झाले. आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयाने २००६ साली आदेश देऊनही एकही नदीजोड प्रकल्पाची साध्या बैठकीची वानवा आहे. माझ्यामते, जोवर सरकारमध्ये बौद्धिक दुष्काळ आहे. तोवर दुष्काळ सोडा कोणताही प्रश्न सुटणार नाही. बरं लोकही इतके सरावली आहेत की, त्यांनी सरकारकडून अपेक्षा करणे कधीच सोडले आहे.

नाम सारख्या सामाजिक संस्था उत्तम कामगिरी करतात. पण सरकारला अफाट संपत्ती आणि मनुष्यबळ असूनही ते जमेना. कारण बुद्धीचा दुष्काळ आहे. बर हवामान बदलामुळे वणवा, वादळ, दुष्काळाचा फटका इतरही देशांना बसत आहे. पण ते देश तेथील सरकार हा विषय गांभीर्याने घेते. आपल्याकडे फक्त जाहिरातबाजी. साहेब फक्त उत्सवप्रिय! मूळ प्रश्नांना जोवर सरकार भिडणार नाही तोवर सगळंच अशक्य आहे.

कर घेऊन कर्जबुडवे उद्योगपतींची कर्जे फेडणे हेच जीवितकार्य असल्याप्रमाणे सरकारचे वर्तन आहे. ३९ रुपयांच्या पेट्रोलवर ६७ रुपयांचा कर लावून १०६ ला विकणारे सरकार अब्जावधी रुपयांची संपत्ती केवळ जाहिरात आणि उद्योगपतींच्या तुंबड्या भरण्यात खर्च करीत आहे. वर्षानुवर्षे हा प्रश्न असूनही त्याकडे दुर्लक्ष अराजकतेकडे नेणारे आहे!!

एक देश एक काहीही

एक देश एक काहीही ही आजकालच्या सत्ताधाऱ्यांचा मंत्र झाला आहे. एक देश एक ओळखपत्र, कर, शिधापत्र, निवडणूक, भाषा. अशा एक ना एक संकल्पना पुढे आणल्या गेल्या. गेल्या पाच सात वर्षात त्याचे यशापयश दिसून आले.

सुरवात करू एक देश एक ओळखपत्रासोबत. आधार ओळखपत्राची तशी मूळ संकल्पना स्वर्गीय भारतरत्न वाजपेयींच्या सत्ताकाळातील. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह याची झाली. २००९ साली सुरवात झाल्यापासून वादग्रस्त ठरलेल्या ह्या योजनेत २०१२ साली माजी न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयात खटले टाकायला सुरवात केली. त्या काळात विरोधात असलेली मोदी अन त्यांचा पक्ष सत्तेत येताच कमालीचा आधार समर्थक झाला. व एक देश एक ओळखपत्रची योजना निरंकुशपणे देशावर लादली गेली.

एक अब्ज ओळखपत्रातील नऊ कोटी बनावट ओळखपत्राचा विषय असो वा त्याच्या विरोधातील असंख्य खटले असोत. कशालाही न जुमानता ती योजना पूर्ण करण्यासाठी येनकेनप्रकारे सक्ती करण्यात आली. त्यातून पुढे अनेक खासगी कंपन्यांनी स्वतःची तुंबडी भरून गेली. विषय इतका चिघळला की अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने कर ओळखपत्र (पॅनकार्ड) व कर विवरण जमा करण्याखेरीज व शासनाकडून अनुदानासाठीच सक्ती मान्य करून अन्य सर्व सक्ती रद्दबादल केली.

अशीच अजून एक योजना पुढे आणली गेली. एक देश एक कर अर्थात, जीएसटी. गमतीची गोष्ट म्हणजे ह्यात इतक्यांदा बदल सरकारने केले की मला ही कररचना कळली म्हणणारा एकही भारतीय ह्या पृथ्वीतलावर अस्तित्वात नाही. याचा उघड फटका व्यापारी अन त्यायोगे सरकारच्या तिजोरीवर पडला. सगळा पैसा सांघिक सरकारच्या खिशात गेला अन भारतीय राज्ये कर्ज काढून आपला उदरनिर्वाह करीत आहेत.

पुढे एक देश एक शिधापत्रिका ही योजना राबवली गेली. यातही अनेक अनुत्तरित प्रश्न उभे ठाकले! शिधापत्र खोटे की खरे हे तपासण्यासाठी आधार असेल ते खरे अशी मापन पद्धती ठरवली गेली. ज्यांनी आधार ओळखपत्र घेतले नाहीत ते बनावट असा सरसकट निष्कर्ष काढून जवळपास तीन कोटी कुटुंबांना ह्यातून बाहेर काढले गेले.

पुढे एक देश एक निवडणूक ही संकल्पना आणण्याची देखील चाचपणी झाली. परंतु पुढे सरकारनेच यातून माघार घेतली. सत्ताधारी पक्षाकडून एक देश एक भाषा अशीही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न आहे.

सत्तेचे विकेंद्रीकरण हे लोकशाहीची शक्ती आणि सार आहे. त्याने अनेकांचा विकास घडवला जाऊ शकतो. याच उलट सत्तेचे केंद्रीकरण हे हुकूमशाहीची पायाभरणी आहे. ह्यातून एकाच ठिकाणी सत्ता केंद्रित होऊन केवळ त्याचाच विकास होऊ शकतो. बाकी आपण सुज्ञच!!

पॅनकार्ड : नवे नियम

पॅनकार्ड अर्थात पर्मनंट अकाउंट नंबर. त्याचे नवे नियम प्रसिद्ध झाले आहेत. दिनांक पाच डिसेंबर पासून ते कार्यान्वित होतील. केंद्रीय कर संचालक मंडळ (सीबीडीटी) यांनी हे पॅनकार्डचे नियम ठरवलेले आहेत. यात काही चांगल्या गोष्टी देखील आहेत. (more…)

कर वाचवण्याचे सोपे पर्याय

कर वाचवण्याचे अनेक पर्याय सध्याला उपलब्ध आहेत. कर वाचवणे पेक्षा ‘स्वतःची कमाई’ वाचवणे जास्त संयुक्तिक राहील. त्यातील काही सोपे पर्याय. ‘पीपीएफ अकाऊंट’ बद्दल कदाचित जाणत असाल. ‘पब्लिक प्रोव्हिडंट फंड’ कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेतून ‘पीपीएफ अकाऊंट’ उघडून सध्याच्या नियमानुसार प्रत्येक वर्षाला सत्तर हजारापर्यंत रक्कम करमुक्त केली जावू शकते. आणि नवीन नियमानुसार. जो येत्या आर्थिक वर्षानुसार त्याची मर्यादा एक लाखापर्यंत वाढवली गेलेली आहे. (more…)