टॅग: जीवन

आभासी जीवन

आभासी जीवन अर्धे जग जगत आहे. जगाची साधारणतः लोकसंख्या आठ अब्जच्या घरात आहे. त्यापैकी ५.२ अब्ज आंतरजाळाशी जोडलेले आहेत. अन ४.२ अब्ज लोक कोणत्या ना कोणत्या समाज माध्यमांवर सक्रिय आहे!

सक्रिय इतके की, जगाच्या कोणत्याही देशापेक्षा अधिक क्रयशक्ती त्यांची होते. मध्यंतरी असाच मुलांच्या दूरदर्शन संचाच्या वेडाचा एक अहवाल पाहण्यात आलेला. साधारण १२ ते १८ वयोगटातील मुले दिवसाकाठी आठ तास दूरदर्शन संचासमोर असतात असं त्यात नमूद केलेलं!

सुरवातीला हे धक्कादायकच वाटलेलं. पण जगाला भ्रमणयोजक आणि आंतरजाळाने वेडसमोर तेही फिके! आजमितीला २ अब्जच्या घरात संकेतस्थळे आहेत. १.९ पद्म (१९०० अब्ज) विपत्र/ईमेल पाठवलेली आहेत. दर क्षणाला गुगल शोधयंत्रावर लाखभर शोध घेतले जातात!

आतापर्यंत ५४ लाख नोंदी/लेख लिहिले गेले आहेत. दर क्षणाला ९५००हुन अधिक ट्विट संदेश प्रकाशित होतात. क्षणाला युट्युबवर ९२ हजाराहून अधिक चित्रफिती पहिल्या जातात. आभासी जीवन इतके मोठे आहे.

क्षणाला ११००हुन अधिक इन्टाग्रामवर छायाचित्रे. तर क्षणाला टंब्लरवर दोन हजार संदेश प्रकाशित होतात. जवळपास ३ अब्ज फेसबुकचे वापरकर्ते आहेत. पिंटरेस्टचा वापर ४० कोटीहून अधिक लोक करतात. क्षणाला सहा हजाराहून अधिक स्कायपी संभाषणे होतात. वर्षाला लाखभर संकेतस्थळांवर आभासी दरोडा टाकला जातो.

क्षणाला लाखभर जीबी माहितीच्या पाहण्या होतात. दिवसाकाठी चार लक्ष संगणक/फुलणक खरेदी केले जातात. तीस लाखांहून अधिक भ्रमणयोजकांची विक्री होते. हे सगळं इतकं मोठं आहे की आपणच नव्हे तर सर्व जग हे आभासी जगत असल्याचे द्योतक आहे.

कोणतीही गोष्ट अकारण केली जात नाही. ज्यात काही फायदा नाही अशी कोणतीही गोष्ट फारकाळ टिकत नाही. आभासी जगाचा फायदा जोपर्यंत आहे तोवर ते असेल. त्याचा प्रत्यक्ष जीवनावरही परिणाम होतो.

आपण कितीही टाळले तरी आपण त्याचा भाग झालेलो आहोत. अनेक देशांचे सरकार आंतरजाळाचा वापर आपल्या नागरिकांवर नियंत्रणासाठी करतात. प्रत्येक गोष्टीच्या चांगल्या वाईट अशा दोन्ही बाजू असतात. सूचनांचा भडीमार मुळे अनेकांच्या दैनंदिन जीवनावर ह्याचे वाईट परिणाम घडले. अपुरी झोप, चिडचिडेपणा, ताण वाढण्यासारख्या गोष्टीही वाढल्या आहेत.

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. ‘अति तिथं माती’ ही म्हण सगळीकडे लागू पडते. त्यामुळे, ह्या आभासी जगात किती रममाण व्हायचे हे ठरवायला हवे. तूर्तास इतकेच. बाकी बोलूच!!

विश्व

प्रत्येकाचे वेगवेगळे विश्व. विश्व नेमके कोणते हाच प्रश्न पडावा इतके भिन्न भिन्न. कुणाला संगीताची आवड. तर त्याला जिकडे तिकडे सुरांच्या मैफिली दिसतात. तर कुणी, ‘राजकारण’ पाहून त्यात रमलेले. प्रत्येकाला, आपआपल्या विश्वात आणि त्यात असणाऱ्या/जाणवणाऱ्या गोष्टींचे अप्रुफ. आणि प्रत्येकाला त्या विश्वातून डोके काढून बाहेर पाहायला वेळच नाही. प्रत्येकाची ‘जीवनाची’ समीकरणे वेगवेगळी. आणि प्रत्येकाच्या ‘सूत्रांनी’ आणि त्यांच्या अनुभवाच्या प्रमेयांनी जीवनाची गणिते सोडवून बाकी शून्य आलेली. (more…)

आयुष्य

आजकाल मनात हे रोज विचार येतात की, जगून काय फायदा? म्हणजे हे आयुष्य कशासाठी? जन्माला येतो. पण कशासाठी? प्रत्येक धडपड, प्रत्येक गोष्ट करतो. प्रत्येक गोष्टीची अपेक्षा आणि त्यासाठी चाललेली धडपड. आणि ती गोष्ट मिळवली की, दुसऱ्या एखाद्या गोष्टीसाठी धडपड. ह्यालाच आयुष्य म्हणतात? बर ते सुख. कोणताही सुख क्षणिकच असते. दुख देखील क्षणिक. पण प्रश्न सुख किंवा दुःखाचा नाही आहे. प्रश्न आहे आयुष्याचा. म्हणजे जन्माचा उद्येश काय हेच कळत नाही. (more…)