योग्य दिशा मिळण्यासाठी बराच काळ लागतो. बराच विचार अन खल करावा लागतो. हे अनुभव आज येतोय. व्यवसाय उभा करायचे ध्येय बाळगून २०१६ साली ठरवलेलं. त्यावेळेसही कठीण काळ सुरु होता. आताही सुरु आहे.
परंतु, आता गेल्या काही काळातील अनुभवातून व मिळालेल्या ज्ञानातून हेही एका देवळातील देवाच्या भेटीप्रमाणे आहे. एखाद्या विषयात तुम्ही पारंगत आहात याचा अर्थ तुम्ही स्वबळावर आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकता. पण त्यासाठी जसे तुम्ही तुमच्या क्षेत्रात शिक्षण आणि सराव केला. तसेच शिक्षण आणि सराव हा व्यवसाय नावाच्या विषयात देखील ते मिळवणे आवश्यक आहे.
त्यासाठी तुम्हाला व्यवसाय काय विषय आहे. त्यासाठी काय करणे आवश्यक आहे. सोबत व्यवसाय सुरु करण्यासाठी व नंतर लागणाऱ्या आर्थिक भांडवलाच नियोजन अशा अनेक गोष्टी येतात. मी अभिमन्यूप्रमाणे ह्या आर्थिक स्वातंत्र्याच चक्रव्यूह भेदले. पण त्यातून यशस्वी बाहेर कसे पडावे. हे मात्र माहित नसल्याने संकट ओढवून घेतले. संकट आल्यावर जे घडायचे ते सगळं घडले. आनंदाची बाब अशी की, यातून लाख मोलाचे ज्ञान मात्र मिळाले.
व्यवसाय करणे आणि तुमचे कार्यक्षेत्र ह्या दोन भिन्न बाबी असतात. व्यवसाय म्हणजे माणसे. त्यांच्याशी संवाद. त्यांच्या अडचणी सोडवण्याची संधी म्हणजे तुमचे काम. अन यातून तुम्हाला अन त्याला दोंघांना फायदा झाला तर झाला यशस्वी व्यवहार. नाहीतर यापैकी एकदा जरी तोट्यात गेला. तर मात्र वितुष्टता निर्माण होते. मी माझ्या कारकिर्दीत अनेक कामे एकहाती सांभाळली. त्यामुळे माझ्या क्षेत्रात मी पारंगत होतो. याची मला जाणीव होती. परंतु, मी ज्या आस्थापनेत कामाला होतो. त्यांचे सर्व ग्राहक अमेरिकादी देशातील होते.
तेथील लोक मी वास्तव्य करतो त्या देशाच्या मानाने सर्वच बाबतीत पुढारलेले. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याचा फारसा फायदा मला इथं झाला नाही. त्यामुळे काही मोजके अपवाद वगळता अनेक अडचणी येत गेल्या. केलेल्या कामाचे पैसे काढणे हे तर वाघाच्या तोंडातील घास काढण्याइतके कठीण काम. सुदैवाने मला बहुतांशी ग्राहकांनी यात मला साहाय्य केले. आता जाऊन वेळेचे महत्व, प्रकल्प स्वीकारण्याआधी त्याचा सखोल अभ्यास. प्रकल्पाची नीट रूपरेषा. अन सगळ्यात महत्वाचं ग्राहकाची इच्छा. अन ते करण्यासाठी आपल्याला परवडेल अशी रक्कम. ह्या बाबी अतिशय महत्वाच्या आहेत. नाहीतर संकटांचे टोळके तुम्हाला हैराण केल्याखेरीज रहात नाही. यासाठी योग्य दिशा मिळणे महत्वाचे आहे.