टॅग: व्यवसाय

योग्य दिशा

योग्य दिशा

योग्य दिशा मिळण्यासाठी बराच काळ लागतो. बराच विचार अन खल करावा लागतो. हे अनुभव आज येतोय. व्यवसाय उभा करायचे ध्येय बाळगून २०१६ साली ठरवलेलं. त्यावेळेसही कठीण काळ सुरु होता. आताही सुरु आहे.

परंतु, आता गेल्या काही काळातील अनुभवातून व मिळालेल्या ज्ञानातून हेही एका देवळातील देवाच्या भेटीप्रमाणे आहे. एखाद्या विषयात तुम्ही पारंगत आहात याचा अर्थ तुम्ही स्वबळावर आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकता. पण त्यासाठी जसे तुम्ही तुमच्या क्षेत्रात शिक्षण आणि सराव केला. तसेच शिक्षण आणि सराव हा व्यवसाय नावाच्या विषयात देखील ते मिळवणे आवश्यक आहे.

त्यासाठी तुम्हाला व्यवसाय काय विषय आहे. त्यासाठी काय करणे आवश्यक आहे. सोबत व्यवसाय सुरु करण्यासाठी व नंतर लागणाऱ्या आर्थिक भांडवलाच नियोजन अशा अनेक गोष्टी येतात. मी अभिमन्यूप्रमाणे ह्या आर्थिक स्वातंत्र्याच चक्रव्यूह भेदले. पण त्यातून यशस्वी बाहेर कसे पडावे. हे मात्र माहित नसल्याने संकट ओढवून घेतले. संकट आल्यावर जे घडायचे ते सगळं घडले. आनंदाची बाब अशी की, यातून लाख मोलाचे ज्ञान मात्र मिळाले.

व्यवसाय करणे आणि तुमचे कार्यक्षेत्र ह्या दोन भिन्न बाबी असतात. व्यवसाय म्हणजे माणसे. त्यांच्याशी संवाद. त्यांच्या अडचणी सोडवण्याची संधी म्हणजे तुमचे काम. अन यातून तुम्हाला अन त्याला दोंघांना फायदा झाला तर झाला यशस्वी व्यवहार. नाहीतर यापैकी एकदा जरी तोट्यात गेला. तर मात्र वितुष्टता निर्माण होते. मी माझ्या कारकिर्दीत अनेक कामे एकहाती सांभाळली. त्यामुळे माझ्या क्षेत्रात मी पारंगत होतो. याची मला जाणीव होती. परंतु, मी ज्या आस्थापनेत कामाला होतो. त्यांचे सर्व ग्राहक अमेरिकादी देशातील होते.

तेथील लोक मी वास्तव्य करतो त्या देशाच्या मानाने सर्वच बाबतीत पुढारलेले. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याचा फारसा फायदा मला इथं झाला नाही. त्यामुळे काही मोजके अपवाद वगळता अनेक अडचणी येत गेल्या. केलेल्या कामाचे पैसे काढणे हे तर वाघाच्या तोंडातील घास काढण्याइतके कठीण काम. सुदैवाने मला बहुतांशी ग्राहकांनी यात मला साहाय्य केले. आता जाऊन वेळेचे महत्व, प्रकल्प स्वीकारण्याआधी त्याचा सखोल अभ्यास. प्रकल्पाची नीट रूपरेषा. अन सगळ्यात महत्वाचं ग्राहकाची इच्छा. अन ते करण्यासाठी आपल्याला परवडेल अशी रक्कम. ह्या बाबी अतिशय महत्वाच्या आहेत. नाहीतर संकटांचे टोळके तुम्हाला हैराण केल्याखेरीज रहात नाही. यासाठी योग्य दिशा मिळणे महत्वाचे आहे.

उद्योगवर्धिनी

उद्योगवर्धिनी म्हणजे उद्योगाचा विकास. खरं तर व्यवसाय आपला मूळ पिंड मुळीच नाही. तरीही अनेक मराठी उद्योजक यशस्वीरीत्या व्यवसाय उभा करीत आहेत. याबाबत आपण चर्चा करायला हवी.

प्रत्येकाच्या जीवनातील बराचसा काळ हा पोटापाण्यासाठी जातो. तेच मुख्य ध्येय अशा स्वरूपाचे आज वातावरण आहे. मध्यमवर्गीयांबाबत बोलायचं झाल्यास ते जवळपास अख्ख आयुष्य त्यासाठी वेचतात. गरीब आणि श्रीमंत हे ठरवणारी गोष्ट म्हणजे पैसे वा संपत्ती.

मराठी माणसांचा जन्म ह्या देशाच्या रक्षणासाठी झालेला आहे. त्यामुळे कदाचित मराठी माणूस विचार करतांना वैयक्तिक अर्थकारणाला हवे तेवढे महत्व देत नाही. त्यामुळे कदाचित मराठी व्यावसायिक एका ठराविक प्रमाणात आहेत.

परंतु, गेल्या काही काळापासून ह्यात बदल होत आहे. आजूबाजूच्या रोजगारांच्या संधीमध्ये होत असलेला चढउतार व अन्य घटनांमुळे तो व्यवसायाकडे वळत आहे. ही आनंदाची बाब आहे.

कोणताही उद्योग सुरु करणे सोपे असते. त्यात, सुरवातीला आनंदही असतो. पण तो उद्योग सुरु ठेवण्यासाठी अनेक गोष्टींचे ज्ञान आणि कृतीची आवश्यकता असते. अनेकदा ज्ञान वा मार्ग माहित नसल्याने वेळेचे व आर्थिक नुकसान होते.

जगाचा विचार करायचा झाल्यास पहिल्या पाच वर्षात निम्मे उद्योग बंद पडतात. कोरोना व टाळेबंदीच्या काळात कदाचित हे प्रमाण अजूनही वाढले असेल. त्यामुळे नवनवे मार्ग चोखंदळून पाहणे आवश्यक आहे!

उद्योग उभा करणे म्हणजे एखादे साम्राज्य उभे करण्याप्रमाणेच असते! तुमच्या बुद्धिकौशल्याने व मेहनतीने तुम्ही त्याला मोठे करू शकता. तुमचे कौशल्य अन वेळेचे भान जेवढे अधिक तेवढा उद्योग लहान मोठा.

अनेकदा परिस्थितीमुळे उद्योगाला मोठा फटका बसतो. त्यातून मार्ग न निघाल्यास तो बंद देखील करण्याची वेळ येते. प्रत्येक उद्योगावर अशी वेळ येते. त्यातून आपण कसे सावरतो हे खरे कौशल्य!!

मी ह्या क्षेत्रात फार ज्ञानी नसल्याने कदाचित फारसे विचार मांडू शकत नाही. परंतु, माझ्या अनुभवानुसार आपल्याकडे उद्योगाला हव्या असणाऱ्या कौशल्य वा गोष्टी नसेल तर त्या आपण शिकू शकतो. किमान आपण अनुभवातून हे ज्ञान नक्कीच मिळवू शकतो!!

सुदैवाने उद्योगासाठी शासकीय पातळीवर जरी अनास्था असली तर सार्वजनिक ठिकाणी ह्याला मागणी आहे. आपण आपले ग्राहक व बाजारपेठ कुठं आहे ह्याचा शोध घेतला तर उद्योग चालू वा वाढू शकतो!!

कोणताही उद्योग करतांना गोड वाणी, संयम आणि चिकाटी हे प्राथमिक निकष आधी आपण अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे!

व्यवसायाचा दहावा नियम

व्यवसायाचा दहावा नियम: झाकली मूठ सव्वा लाखाची!

व्यवसायाचा दहावा नियम: झाकली मूठ सव्वा लाखाची!

व्यवसायाचा दहावा नियम: झाकली मूठ सव्वा लाखाची!

अर्थ: व्यंग/आपल्यातील उणेपणा कुणाला कळू देऊ नये!

व्यवसायाचा नववा नियम

व्यवसायाचा नववा नियम: तेरड्याचा रंग तीन दिवस!

व्यवसायाचा नववा नियम: तेरड्याचा रंग तीन दिवस!

व्यवसायाचा नववा नियम: तेरड्याचा रंग तीन दिवस!

अर्थ: एखादे कार्य जोरात सुरु होऊन काही दिवसानंतर ते अचानक बंद पडणे!

व्यवसायाचा आठवा नियम

व्यवसायाचा आठवा नियम: अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था!

व्यवसायाचा आठवा नियम: अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था!

व्यवसायाचा आठवा नियम: अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था!

व्यवसायाचा सातवा नियम

व्यवसायाचा सातवा नियम: देखल्या देवा दंडवत!

व्यवसायाचा सातवा नियम: देखल्या देवा दंडवत!

व्यवसायाचा सातवा नियम: देखल्या देवा दंडवत!

व्यवसायाचा सहावा नियम

व्यवसायाचा सहावा नियम: लाथ मारेन तिथे पाणी काढेन!

व्यवसायाचा सहावा नियम: लाथ मारेन तिथे पाणी काढेन!

व्यवसायाचा सहावा नियम: लाथ मारेन तिथे पाणी काढेन!

व्यवसायाचा पाचवा नियम

व्यवसायाचा पाचवा नियम: खिळ्यासाठी नाल गेला, नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी स्वार गेला, एवढा अनर्थ खिळ्याने केला!

व्यवसायाचा पाचवा नियम: खिळ्यासाठी नाल गेला, नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी स्वार गेला, एवढा अनर्थ खिळ्याने केला!

व्यवसायाचा पाचवा नियम: खिळ्यासाठी नाल गेला, नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी स्वार गेला, एवढा अनर्थ खिळ्याने केला!

व्यवसायाचा तिसरा नियम

आधी केले मग सांगितले!

आधी केले मग सांगितले!

आधी केले मग सांगितले!

व्यवसायाचा दुसरा नियम

उधारीचे पोते सव्वाहात रिते

उधारीचे पोते सव्वाहात रिते

उधारीचे पोते सव्वाहात रिते