हे सर्टीफिकेशन खुपंच कमी लोकांना मिळते. आणि हे टिकवणे त्याहून अवघड. कोणी संताने नमूद म्हटले आहे नां ‘जया अंगी माथेफिरूपण| तया यातना कठीण||’ खर आहे म्हणा. हे येरा गबाळ्याचे काम नोहे. दोनशे बळी घेऊन देखील कसाबला ‘आरोपी’ आणि ‘दहशतवादी’वरच समाधान मानावे लागले. कसाब काय आणि राजा काय. आणि राजू काय आरोपीच्याच सर्टीफिकेशन पर्यंत जाऊ शकतात. एवढेच काय नक्षलवादी देखील फार फार तर ‘दहशतवादी’ सर्टिफिकेट मिळवू शकतील. कारण, ‘माथेफिरू’ची परीक्षा तितकी अवघड आहे. ‘गुरु’जी सुद्धा संसदेत केलेल्या हल्ल्यानंतर जेमतेम ‘गुन्हेगार’ सर्टिफाईड होवू शकले. (more…)